Sunday, December 21, 2008

माकडाच्या हातात शॅंपेन

शाहरुख खानला मी माकडापेक्षा अधिक मानत नाही. जेव्हा तो एखादा सणसणीत performance देतो (कभी हा कभी ना, चक दे वगैरे) किंवा एखद्या मुरलेल्या businessman प्रमाणे वागतो (IPL मध्ये त्याच्याच टीमने सर्वात जास्त नफा कमावला होता!) तेव्हा त्याला उत्क्रांतीमध्ये इतर प्रजातींपेक्षा अधिक प्रगती केलेल्या माकडाइतकाच मानतो!

थोडक्यातच सांगायचं तर स्वत:च्या पैश्यांनी मल्टिप्लेक्सचं महागडं तिकिट काढून शाहरुख नावाची तीन तासांची डोएकेदुखी पदरात पाडून घेणाऱ्यातला मी नक्कीच नव्हे. पण माझ्या टीमने मोठ्या उत्साहाने ’रब ने..’चा प्लान बनवला होता त्यामुळे यावेळी बचाव शक्य नव्हता. आणि शेवटी जे व्हायचे ते झालेच. अनुष्का शर्मा नामक कमनीय बांध्याच्या आणि बऱ्यापैकी बोलका चेहरा असणाऱ्या कुडीसमोर म्हातारा शाहरुख त्याच्या ठराविक त्या पाट्या टाकतो आणि ते तीन तास असह्य करतो.

अनुष्का शर्मा, जी आधी खूप impressive वाटते, ती वेष बदललेल्या माकडाला ओळखायला तीन तास घेते, म्हणजे ती काही ’सगळ्या सुंदर मुली मठ्ठ असतात’ ला अपवाद ठरत नाही. मुळात ती नव्या रुपात आलेल्या cheap शाहरुखच्या प्रेमात पडूच कशी शकेल हा प्रश्ण ना तिला पडतो ना दिग्दर्शकाला. आदित्य चोप्राकडून एव्हढ्या पोकळ अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण शाहरुखला assume केल्यामुळे दिलवाले...चा हा दिग्दर्शक साफ fail गेला आहे.

मला इथे काही चित्रपट परिक्षण लिहायचं नाहिये. पण राहून राहून नुकत्याच एका ’आंखो देखा’ love triangle ची आठवण येते आहे. तो देखणा, हुशार, खानदानी, उत्तम sense of humour असणारा. तीही सुंदर, ambitious आणि lively. आणि तिसरा कोन अर्थातच त्या शाहरुख-सामाईकचा. ती आणि शाहरुख एकाच departmentमध्ये होते आणि आपल्या असली heroची entry होण्या आधी किमान एक वर्ष एकमेकाला ओळखत होते. पण आपला hero आणि ती यांचं understanding अगदी बघण्यासारखं होतं. Cross-departmental functioning दोघंही इतक्या smoothly handle करायचे की क्या बात है! आणि शाहरुख केवळ street-smart, qualification - हुशारी यात आपल्या heroच्या पासंगालाही न पुरणारा.

पण त्याची fielding लाजवाब असणार यात शंकाच नाही. गेल्या रविवारी तिचं आणि त्या so-called शाहरुखचं लग्न झालं. ऑफिसमधून आम्ही सगळे गेलो होतो. आपला heroसुद्धा होता, अगदी comfortable.. व्यक्त न केलेल्या भावना सहज लपवून टाकत असावा किंवा बाकीच्यांनाच त्या दोघांच्या होऊ शकणाऱ्या गोष्टीत खूप जास्त interest होता.

काही असो मला मात्र रब ने.. पाहिल्यावर तिची आठवण आली. अमिताभ समोर असताना कोणी शाहरुख prefer करतं का? या मुलींची हीच गोष्ट मला समजत नाही बुवा.

Anyway, गोष्टीतल्या तिघांनाही मी अगदी जवळून ओळखतो त्यामुळे मी तिघांचही चांगलच व्हावं असं म्हणणार पण प्रश्ण मात्र मनात राहिलच, प्रेम खरंच आंधळं असतं की या गाठी वरच बांधलेल्या असतात..