Monday, February 9, 2009

त्या वळणावर

आयुष्यात ती वेळ येतेच. आणि अर्थातच ती काही सांगून येत नाही.

त्या एका निर्णयावर म्हणलं तर सगळंच काही अवलंबून असतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर ’हो’ किंवा ’नाही’ देणं हे शिंक आल्यावर शिंकून मोकळं होण्याइतकं प्रत्येक वेळीच शक्य नसतं.

आणि ज्या उत्तराने आयुष्याचा डाव मांडला जातो तो प्रश्नच मुळात क्लिष्ट असतो..

हो म्हणावं तर अगदी एखाद्या bollywood flick प्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी, शेहनाई आणि palette मधले सगळेच रंग उधळलेले दिसावेत. पण त्याचबरोबर येणाऱ्या जवाबदाऱ्यांचं extra baggage, स्वातंत्र्याला फासलं जाणारं काळं, प्रत्येक गोष्टीत स्वत:शिवाय आणखी एकाचा विचार करायची mandate.. आणि आणखी हजार गोष्टी..

पण नाही म्हणायला एखदंतरी logical कारण सापडणं आवश्यक असतं. च्यामारी.. गरजेच्या वेळीच एरव्ही unavoidable असणारं logic कुठे गोते खातं त्या परमेश्वरास ठाऊक.

काही गोष्टीतून सुटका नसते हेच खरं!