Wednesday, July 14, 2010

Feeling miserable...


आज भाविकचं लग्न होतं. भाविक माझा कॉलेजमधला मित्र. गेली बारा-तेरा वर्षं आम्ही एकमेकांना ओळखतो. इंजिनीयरिंगनंतर तो इतर बऱ्याच batchmates प्रमाणे MS करायला अमेरिकेत गेला होता आणि आमचा संपर्क कमी झाला.

मी मुंबईतच होतो. मग MS संपवून तो परत आला. बॅंगलोरमध्ये त्याने जॉब जॉईन केला. मेल्स, ओर्कुट वगैरे मधून आम्ही ख्याली-खुशालीची देवाणघेवाण करायचोच पण प्रत्यक्ष भेटणं खूपच कमी होतं.

मग अडीच वर्षांपूर्वी मी एक कंपनी जॉईन केली. विशाल, माझा इंजिनीयरिंगमधला आणखी एक मित्र त्या कंपनीत already होता हे मला माहित होतच. पण भाविकनेही हीच कंपनी काही महिन्यांपूर्वीच जॉइन केली होती. मग काय मला तक्रार करायला किंवा नव्या कंपनीत कोणी फारसं ओळखीचं नाही असं म्हणायला जागाच नव्हती.

रोज लंचच्या वेळी आम्ही एकत्र जमायचो आणि धुमाकूळ घालायचो. जुने जोक्स, जुने फ़ंडे, जुन्या आठवणी नित्य नव्याने चघळल्या जायच्या. लंचच्या वेळी माझं डेस्क म्हणजे सगळ्यात जास्त noisy अड्डा व्हायचा.

एकूणच एकाच wavelength मध्ये असल्याने भाविक माझा कॉलेजमध्ये होता त्याहीपेक्षा जवळचा मित्र झाला!

आज त्याचं लग्न होतं आणि मी मुंबईला परतणाऱ्या flight मध्ये बसून हा useless पोस्ट लिहितो आहे. काल संध्याकाळी बऱ्याच उशीरा एक मीटिंग ठरली आणि मी आजचा पूर्ण दिवस दिल्लीत घालवला. Delay झालेलं flight थोड्या वेळाने land होइल आणि तेव्हा त्याचं reception संपवून सगळे घरी गेलेले असतील.

काही गोष्टी निसटून गेल्याची खूप चुटपूट लागून राहते. You really feel miserable. कशाला दोष द्यायचा कळत नाही. आपल्या हाताबाहेर असणाऱ्या गोष्टींना का आयुष्यात कधी-कधीच जमून येणाऱ्या वाईट टायमिंगला.

ते काही असो, भाविकचं लग्न miss केल्याची टोचणी मी सहजासहजी विसरणार नाही.

Sunday, March 28, 2010

शिक्षणाच्या आयचा घो!

आपणा भारतीयांना फिरंगी गोष्टींचं एव्हढं आकर्षण का आहे?

विशेषत: जेव्हा गोऱ्या कातडीतला (मनुष्य) प्राणी आपल्याला काही करायला सांगतो तेव्हा तसे न केल्यास आपल्या सात पिढ्या नरकात जातील असे आपण का वागतो?

कपिल सिबल यांनी परदेशी विद्यापीठांना भारतात दुकान टाकायचा परवाना दिलाय. गेले काही दिवस त्यावरून उलटसुलट चर्चा चालु आहेत. माझी स्वत:ची वर मांडलेली प्रतिक्रिया थोडी अतिशयोक्तीचीच आहे पण मला खरंच काही प्रश्न पडले आहेत...

परदेशी विद्यापीठांचे Brand Name लक्षात घेता त्यांनी मोठ्या संख्येने Qualified मुलं तयार केली तर त्या मुलांना रोजगाराच्या संधी हेच सरकार स्वत: निर्माण करणार आहे काय की जेणेकरून हीच मुलं देशाच्या विकासकार्यात काही योगदान देऊ शकतील?

ही परदेशी विद्यापीठं दुकान टाकणार म्हणजे आपल्याकडच्या शिक्षण आणि संबंधित क्षेत्रातील लोकांना अधिक संधी उपलब्ध होतील पण त्याहीपेक्षा कित्येक मोठ्या संख्येने शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलांना याच मातीत विकासाच्या संधी मिळवून देण्यात या विद्यापीठांचं काय योगदान असणार आहे?

या विद्यापीठात शिक्षण घ्यायचं तर त्यासाठी इथल्या इतर कोणत्याही विद्यापीठात मोजावी लागते त्यापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार. मग आपल्याकडील अधिकतम विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा मिळणार?

उत्तम दर्जाचं शिक्षण आपल्या मुलांना मिळावं हा उदात्त हेतू असला तरीही ते शिक्षण घेवून आपल्या देशाची मूलभूत प्रगती होण्यासाठी त्यांच्या ऊर्जेचा वापर कसा करून घेता येईल यासाठी सरकार या विद्यापीठांना बांधील ठेवेल क?

शिवाय हे साध्य करताना त्या शिक्षणाला भारतीय मातीचा वास आला पाहिजे. त्यासाठी हे परदेशी पाहुणे काय करतील?

साखर असते तिथेच मुंग्या येतात. आपली मोठ्ठी लोकसंख्या आणि त्यातही किमान ५० टक्के लोकसंख्या पुढील २० वर्षं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शिक्षण घेणारी असेल. ही पिढी आजपासून पन्नास वर्षांनी दिसणारा भारत घडवणार आहे. मग शिक्षणक्षेत्राशी संबंधित चर्चा केवळ परदेशी विद्यापीठांबद्दल मर्यादित असून कसे चालेल?

जिथे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतात तिथे दुकान टाकणं आणि चालवणं सोपं असतं. परदेशी विद्यापीठांकडून भारताच्या प्रगतीला हातभार लावण्याची अपेक्षा असेल तर त्यांना सगळी महानगरं आणि प्रमुख शहरं सोडून इतर ठिकाणी स्वत:चा कारभार सुरु करण्यास का सांगू नये? त्यांची Brand Value खरंच एव्हढी मोठी असेल तर विद्यार्थी ते कुठेही असतील तिथे जाणार नाहित का? शिवाय त्या त्या शहरांचा, गावांचा विकास होण्यास मदत होणार नाही का?

घडीव साच्यातल्या आकर्षक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त भारताच्या प्रगतीला पोषक असे अभ्यासक्रम सुरु करण्याची सक्ती या विद्यापीठांवर का असू नये? आणि असे करण्यास चुकणारी विद्यापीठांना गाशा गुंडाळण्याची सूचना करण्याची हिंमत सरकार दाखवेल का?

भरमसाठ फी भरून ऍडमिशन घेणाऱ्या दर दहा विद्यार्थ्यांमागे एक (केवळ) आर्थिकदृष्ट्या मागास पण अत्यंत लायक विद्यार्थी मोफत शिकवण्याची सक्ती का असू नये? अर्थातच असे लायक विद्यार्थी कोणतीही जातपात मधे न आणता अत्यंत पारदर्शक प्रक्रियेतून निवडण्याचे साहस सरकार दाखवेल काय?

आणि सगळ्यात शेवटी, एकूण उत्पन्नाचा ठराविक हिस्सा देशाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी इथेच खर्च करण्याची अट सरकार घालेल? आणि गोरे पाहुणे ती अट जुमानतील?

Sunday, January 17, 2010

Teach for India!

मिलिंद काल जवळपास सात-आठ वर्षांनी भेटला. एक वर्षाने सिनियर होता मला कॉलेजमध्ये. Extracurricular activities मध्ये भाग घेताना त्याची ओळख झाली होती. इंजिनीयरिंग संपलं. सगळेच करतात त्याप्रमाणे तो MS करायला US ला गेला आणि इतर मित्रांकडून अधनंमधनं त्याची खबर मिळायची.

पंधरवड्यापूर्वी कॉलेजमधले मैत्र भेटलो होतो तेव्हा तनुश्री म्हनाली की मिलिंद दोन-तीन वर्षांपूर्वीच भारतात परत आला. त्यानं बंगलोरला जॉब घेतला होता. पण सध्या तो मुंबईतच आहे आणि सध्या तो Teach for India मधून शाळामास्तर झालाय.

माझ्या डोळ्यासमोर पटकन एक sketch उभं राहिलं. एका संपन्न मारवाडी घरातला मुलगा. इंजिनीअर झाला, US ला गेला, MS केलं. आता चांगली मारवाडी मुलगी बघून पंचतारांकित लग्न करायचं आणि झालंच तर family business जॉइन करायचा. आता हे काय भलतच.

मग काल जेव्हा मिलिंद भेटला तेव्हा सगळी कहाणी ऐकली. एखाद्या मूलभूत कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायची इच्छा तो नेहमी घरच्यांसमोर बोलून दाखवायचा. मग एके दिवशी Teach for India ची जाहिरात त्याला त्याच्या आईने दाखविली. महाशय जॉइन देखिल झाले. ज्या वयात पैश्याच्या मागे धावायचं तो मोह किमान दोन वर्षं बाजुला ठेवून मुनिसिपाल्टिच्या कुठल्याशा प्राथमिक शाळेत हा माणूस सध्या मास्तर म्हणून काम करतोय.

तु निर्णय घ्यायला किती वेळ घेतलास? घरच्यांनी निर्णय कसा स्वीकारला? दोन वर्षांनंतर काय? मी, रावी, नयन, गौरी, विवेक, काजल, श्वेता - आमच्या या सगळ्या प्रश्नांची त्याने ज्या उत्साहाने आणि मनापासून उत्तरं दिली त्यावरूनच खात्री पटली की आपल्या मनाने मनापासून एखादा वसा स्वीकारला की sky is the limit!

मिलिंद Teach for India मार्फत जे काम करतोय त्याच्या details लवकरच. सध्या मी दादरमधल्या शिंदेवाडी महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यामाच्या इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक श्रीयुत मिलिंदभैया यांना भेटायचा प्लान करतो आहे.

श्रीयुत मिलिंदभैय्या, I am proud of you!