tag:blogger.com,1999:blog-20369507548061401552024-02-07T20:01:09.429-08:00आरस्पानी....TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.comBlogger40125tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-76364405601751950202011-02-27T09:36:00.000-08:002011-02-27T09:49:04.493-08:00Compliment!तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट!<br /><br />सोमवार किंवा मंगळवारची सकाळ असेल. आठवड्याची सुरुवात म्हणजे प्रत्येक सकाळ आम्हास युद्धप्रसंग. मी एका start-up मध्ये काम करत होतो. काय दिवस होते ते म्हाराजा! आठवड्याची सुरुवात चार-पाच ठिकाणी लागलेल्या आगी विझवून व्हायची. आमचा बॉसही वेडा होता. टीममधल्या पोरांनी घातलेले गोंधळ तर निस्तरायचेच पण वेड्या बॉसलाही ताळ्यावर आणायचं. मग अशात कोणी मोबाईलवर फोन करून वेळ वाया घालवायला सुरुवात केली की तळपायाचीच नाही तर आजूबाजूचीही आग मस्तकात जायची.<br /><br />आणि अशाच एका सोमवारी-मंगळवारी मी बॉसला माझा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करीत होतो की हे एकविसावे शतक असले तरीही माणसाने दैनंदिन जीवनात जादूची अपेक्षा करु नये आणि तेव्हढ्यात माझा फोन वाजला. क्षणभर तरी त्या नमुन्यापासून सुटका होईल म्हणून मी तो फोन घेतला.<br /><br />’सर मी अमूक अमूक कंपनीतर्फे तमूक तमूक बोलते आहे, तुमची दोन मिनिटे घेऊ का?’<br /><br />कंपनीचं नाव नवीन वाटलं, ’कशासंदर्भात बोलायचं आहे तुम्हाला?’<br /><br />’सर, आमच्या कंपनीने %ऽ* अशी एक कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि तुम्ही याच संदर्भातील काम करता म्हणून...’<br /><br />स्वत:च्या खिशातले पैसे मोजून लोकांनी क्षुल्लक ज्ञान घ्यायला यावं अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांबद्दल मला फार ममत्त्व नाही, ’मी आत्ता फारच busy आहे आणि नाही बोलू शकत तुमच्याशी.’<br /><br />असले फोन विसरून जायचे असतात पण त्या बयेनं चार वाजता पुन्हा फोन केला. मी चारच्या प्रथेप्रमणे खास मित्रांबरोबर दहा मिनिटांचा कॉफीपानाचा ब्रेक घेत होतो, ’कोण बोलतंय?’<br /><br />’सर, मी तुम्हाला सकाळी फोन केला होता? आमची कॉन्फरन्स.. बरोबर पंधरा दिवसांनी आहे.. नामांकित वक्ते...’<br /><br />बया सुरुच झाली एकदम, ’बरं असं करा ॓ऽ%ऽ हा माझा इमेल आयडी आहे. मला कॉन्फरन्सचे details मेल करा, ते पाहून मी पुढे ठरवेन.’<br /><br />सहसा अशी सापत्न वागणूक मिळाल्यावर हे मार्केटिंगवाले नाद सोडून देतात. त्यामुळे मीसुद्धा हा प्रसंग लक्षात ठेवायचं काही कारण नव्हतं. पण बया चिकाटीची निघाली. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन.<br /><br />’सर, मी अमूक अमूक कंपनीकडून तमूक तमूक. मेल मिळाला का तुम्हाला माझा?’<br /><br />कोणी आपल्याला कारण नसताना उगाचच भाव दिला की आपला तोरा वाढतोच, ’ओह.. मेल केला का तुम्ही? मी मिस केला बहुतेक.’ आता नालायकपणा करायचाच म्हणला की कितीही करता येतो!<br /><br />’It's okay पण तुम्ही चेक करता का? माझ्या %ऽ*! या आयडीवरून तुम्हाला मेल आला असेल.’<br /><br />मेल खरंच येऊन पडला होता. त्या कॉन्फरन्सला जाण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. पण आता उगाच तोंडावर नाही कशाला म्हणा, ’बरं मी असं करतो, सगळी माहिती नीट वाचतो आणि मग तुम्हाला कळवतो.'<br /><br />चौथ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन!<br /><br />’सर, आपण माहिती सगळी पाहिली असेलच. कित्ती छान अमुची कॉन्फरन्स.. नामांकित वक्ते.. netvorking ची संधी...’<br /><br />जरा जास्त होत होतं. पण ती माझ्या आगाउपणावर जराही न भडकता इतक्या विनम्रतेने बोलत होती की मला प्रश्न पडला की आत हिला कटवायची कशी?, ’<span class="">Actually</span> याच तारखांना माझ्या दुसऱ्या काही मीटिंग्स ठरलेल्या आहेत. जर त्यात काही बदल झाला तर मी नक्की विचार करेन.’<br /><br />खरंतर स्पष्ट नाहीच म्हणायला हवं होतं पण उगाच भाव मिळतोय म्हणून जादा नखरे कशाला करा म्हणून मी तो विषय तिथेच सोडून दिला.<br /><br />एक दिवस सोडून पुन्हा एकदा फोन!<br /><br />’सर, मी तमूक तमूक!’<br /><br />आता मात्र कमाल झाली. चार वेळा बोलणं झाल्यावर नुसत्या नावावरून न ओळखण्याइतपत काही माझं वय झालेलं नव्हतं. पण आगाऊपणा मी नाही ती करत होती, ’तुम्ही प्रत्येक invitee बरोबर इतका follow-up करता?’ मी सरळ मुद्द्यालाच हात घातला.<br /><br />’पण सर, कॉन्फरन्स अमुची कित्ती छान...’<br /><br />’मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी कळवेन म्हणून, तुम्ही कशाला एव्हढा follow-up...’<br /><br />’सर, सॉरी जर तुम्हाला त्रास झाला असेल तर. माझा तो उद्देश नव्हताच. पण तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगायची होती.’<br /><br />देवा.. आता हिची नवी गोष्ट सुरु होणार?, ’हे बघा..’<br /><br />’सर, मी पहिल्या दिवशी तुमच्याशी बोलले तेव्हा मला तुमचा आवाज अतिशय आवडला. म्हणून मी थोडा जास्त follow-up केला. तुमचा आवाज खरंच खूप छान आहे.’<br /><br />मी गार! कसंतरी बावळटासारखं, ’ओह थँक्स’ म्हणालो आणि फोन ठेवला.<br /><br />मित्रमंडळींमध्ये काही दिवस हा प्रसंग अर्थातच चेष्टेसाठी पुरला.<br /><br />आणि आत्ता हा प्रसंग आठवायचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी दिल्लीला एका क्लायेंट मीटिंगसाठी गेलो होतो. क्लायेंटच्या कोरियन टीममधूनही काही मंडळी आलेली होती या मीटिंगसाठी. तासाभराची मीटिंग तीन तास चालली आणि पुष्कळ वादविवाद घालून आणि एकमेकाची उणीदुणी काढून झाली होती. मीटिंग कधी एकदा संपते याचीच सगळे वाट पाहत होते बहुतेक.<br /><br />मग finally निरोपाचा hand-shake करताना डोळे मिचकावून तो मुख्य कोरियन मला म्हणाला, ’I am not gay but I really loved your voice!’<br /><br />मी गार, अजून दोघे टाळ्या वाजवू लागले, तिसऱ्याने ठेवणीतले हसू चेहऱ्यावर आणले आणि चौथा डोळे विस्फारून पाहत होता.<br /><br />मी पुन्हा एकदा बावळटासारखं थॅंक्स म्हणून बाहेर पडलो!TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-89223622638161674212010-07-14T19:41:00.000-07:002010-07-14T19:43:30.760-07:00Feeling miserable...<p><br />आज भाविकचं लग्न होतं. भाविक माझा कॉलेजमधला मित्र. गेली बारा-तेरा वर्षं आम्ही एकमेकांना ओळखतो. इंजिनीयरिंगनंतर तो इतर बऱ्याच batchmates प्रमाणे MS करायला अमेरिकेत गेला होता आणि आमचा संपर्क कमी झाला.</p><p>मी मुंबईतच होतो. मग MS संपवून तो परत आला. बॅंगलोरमध्ये त्याने जॉब जॉईन केला. मेल्स, ओर्कुट वगैरे मधून आम्ही ख्याली-खुशालीची देवाणघेवाण करायचोच पण प्रत्यक्ष भेटणं खूपच कमी होतं.</p><p>मग अडीच वर्षांपूर्वी मी एक कंपनी जॉईन केली. विशाल, माझा इंजिनीयरिंगमधला आणखी एक मित्र त्या कंपनीत already होता हे मला माहित होतच. पण भाविकनेही हीच कंपनी काही महिन्यांपूर्वीच जॉइन केली होती. मग काय मला तक्रार करायला किंवा नव्या कंपनीत कोणी फारसं ओळखीचं नाही असं म्हणायला जागाच नव्हती.</p><p>रोज लंचच्या वेळी आम्ही एकत्र जमायचो आणि धुमाकूळ घालायचो. जुने जोक्स, जुने फ़ंडे, जुन्या आठवणी नित्य नव्याने चघळल्या जायच्या. लंचच्या वेळी माझं डेस्क म्हणजे सगळ्यात जास्त noisy अड्डा व्हायचा.</p><p>एकूणच एकाच wavelength मध्ये असल्याने भाविक माझा कॉलेजमध्ये होता त्याहीपेक्षा जवळचा मित्र झाला!</p><p>आज त्याचं लग्न होतं आणि मी मुंबईला परतणाऱ्या flight मध्ये बसून हा useless पोस्ट लिहितो आहे. काल संध्याकाळी बऱ्याच उशीरा एक मीटिंग ठरली आणि मी आजचा पूर्ण दिवस दिल्लीत घालवला. Delay झालेलं flight थोड्या वेळाने land होइल आणि तेव्हा त्याचं reception संपवून सगळे घरी गेलेले असतील.</p><p>काही गोष्टी निसटून गेल्याची खूप चुटपूट लागून राहते. You really feel miserable. कशाला दोष द्यायचा कळत नाही. आपल्या हाताबाहेर असणाऱ्या गोष्टींना का आयुष्यात कधी-कधीच जमून येणाऱ्या वाईट टायमिंगला.</p><p>ते काही असो, भाविकचं लग्न miss केल्याची टोचणी मी सहजासहजी विसरणार नाही.</p>TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-69808604744224305412010-03-28T03:34:00.000-07:002010-03-28T03:36:14.498-07:00शिक्षणाच्या आयचा घो!आपणा भारतीयांना फिरंगी गोष्टींचं एव्हढं आकर्षण का आहे?<br /><br />विशेषत: जेव्हा गोऱ्या कातडीतला (मनुष्य) प्राणी आपल्याला काही करायला सांगतो तेव्हा तसे न केल्यास आपल्या सात पिढ्या नरकात जातील असे आपण का वागतो? <br /><br />कपिल सिबल यांनी परदेशी विद्यापीठांना भारतात दुकान टाकायचा परवाना दिलाय. गेले काही दिवस त्यावरून उलटसुलट चर्चा चालु आहेत. माझी स्वत:ची वर मांडलेली प्रतिक्रिया थोडी अतिशयोक्तीचीच आहे पण मला खरंच काही प्रश्न पडले आहेत...<br /><br />परदेशी विद्यापीठांचे Brand Name लक्षात घेता त्यांनी मोठ्या संख्येने Qualified मुलं तयार केली तर त्या मुलांना रोजगाराच्या संधी हेच सरकार स्वत: निर्माण करणार आहे काय की जेणेकरून हीच मुलं देशाच्या विकासकार्यात काही योगदान देऊ शकतील?<br /><br />ही परदेशी विद्यापीठं दुकान टाकणार म्हणजे आपल्याकडच्या शिक्षण आणि संबंधित क्षेत्रातील लोकांना अधिक संधी उपलब्ध होतील पण त्याहीपेक्षा कित्येक मोठ्या संख्येने शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलांना याच मातीत विकासाच्या संधी मिळवून देण्यात या विद्यापीठांचं काय योगदान असणार आहे?<br /><br />या विद्यापीठात शिक्षण घ्यायचं तर त्यासाठी इथल्या इतर कोणत्याही विद्यापीठात मोजावी लागते त्यापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार. मग आपल्याकडील अधिकतम विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा मिळणार?<br /><br />उत्तम दर्जाचं शिक्षण आपल्या मुलांना मिळावं हा उदात्त हेतू असला तरीही ते शिक्षण घेवून आपल्या देशाची मूलभूत प्रगती होण्यासाठी त्यांच्या ऊर्जेचा वापर कसा करून घेता येईल यासाठी सरकार या विद्यापीठांना बांधील ठेवेल क?<br /><br />शिवाय हे साध्य करताना त्या शिक्षणाला भारतीय मातीचा वास आला पाहिजे. त्यासाठी हे परदेशी पाहुणे काय करतील?<br /><br />साखर असते तिथेच मुंग्या येतात. आपली मोठ्ठी लोकसंख्या आणि त्यातही किमान ५० टक्के लोकसंख्या पुढील २० वर्षं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शिक्षण घेणारी असेल. ही पिढी आजपासून पन्नास वर्षांनी दिसणारा भारत घडवणार आहे. मग शिक्षणक्षेत्राशी संबंधित चर्चा केवळ परदेशी विद्यापीठांबद्दल मर्यादित असून कसे चालेल?<br /><br />जिथे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतात तिथे दुकान टाकणं आणि चालवणं सोपं असतं. परदेशी विद्यापीठांकडून भारताच्या प्रगतीला हातभार लावण्याची अपेक्षा असेल तर त्यांना सगळी महानगरं आणि प्रमुख शहरं सोडून इतर ठिकाणी स्वत:चा कारभार सुरु करण्यास का सांगू नये? त्यांची Brand Value खरंच एव्हढी मोठी असेल तर विद्यार्थी ते कुठेही असतील तिथे जाणार नाहित का? शिवाय त्या त्या शहरांचा, गावांचा विकास होण्यास मदत होणार नाही का?<br /><br />घडीव साच्यातल्या आकर्षक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त भारताच्या प्रगतीला पोषक असे अभ्यासक्रम सुरु करण्याची सक्ती या विद्यापीठांवर का असू नये? आणि असे करण्यास चुकणारी विद्यापीठांना गाशा गुंडाळण्याची सूचना करण्याची हिंमत सरकार दाखवेल का?<br /><br />भरमसाठ फी भरून ऍडमिशन घेणाऱ्या दर दहा विद्यार्थ्यांमागे एक (केवळ) आर्थिकदृष्ट्या मागास पण अत्यंत लायक विद्यार्थी मोफत शिकवण्याची सक्ती का असू नये? अर्थातच असे लायक विद्यार्थी कोणतीही जातपात मधे न आणता अत्यंत पारदर्शक प्रक्रियेतून निवडण्याचे साहस सरकार दाखवेल काय?<br /><br />आणि सगळ्यात शेवटी, एकूण उत्पन्नाचा ठराविक हिस्सा देशाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी इथेच खर्च करण्याची अट सरकार घालेल? आणि गोरे पाहुणे ती अट जुमानतील?TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-21188976463162041882010-01-17T09:04:00.000-08:002010-01-17T09:09:04.464-08:00Teach for India!<p> </p><p>मिलिंद काल जवळपास सात-आठ वर्षांनी भेटला. एक वर्षाने सिनियर होता मला कॉलेजमध्ये. Extracurricular activities मध्ये भाग घेताना त्याची ओळख झाली होती. इंजिनीयरिंग संपलं. सगळेच करतात त्याप्रमाणे तो MS करायला US ला गेला आणि इतर मित्रांकडून अधनंमधनं त्याची खबर मिळायची.</p><p>पंधरवड्यापूर्वी कॉलेजमधले मैत्र भेटलो होतो तेव्हा तनुश्री म्हनाली की मिलिंद दोन-तीन वर्षांपूर्वीच भारतात परत आला. त्यानं बंगलोरला जॉब घेतला होता. पण सध्या तो मुंबईतच आहे आणि सध्या तो Teach for India मधून शाळामास्तर झालाय.</p><p>माझ्या डोळ्यासमोर पटकन एक sketch उभं राहिलं. एका संपन्न मारवाडी घरातला मुलगा. इंजिनीअर झाला, US ला गेला, MS केलं. आता चांगली मारवाडी मुलगी बघून पंचतारांकित लग्न करायचं आणि झालंच तर family business जॉइन करायचा. आता हे काय भलतच.</p><p>मग काल जेव्हा मिलिंद भेटला तेव्हा सगळी कहाणी ऐकली. एखाद्या मूलभूत कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायची इच्छा तो नेहमी घरच्यांसमोर बोलून दाखवायचा. मग एके दिवशी Teach for India ची जाहिरात त्याला त्याच्या आईने दाखविली. महाशय जॉइन देखिल झाले. ज्या वयात पैश्याच्या मागे धावायचं तो मोह किमान दोन वर्षं बाजुला ठेवून मुनिसिपाल्टिच्या कुठल्याशा प्राथमिक शाळेत हा माणूस सध्या मास्तर म्हणून काम करतोय.</p><p>तु निर्णय घ्यायला किती वेळ घेतलास? घरच्यांनी निर्णय कसा स्वीकारला? दोन वर्षांनंतर काय? मी, रावी, नयन, गौरी, विवेक, काजल, श्वेता - आमच्या या सगळ्या प्रश्नांची त्याने ज्या उत्साहाने आणि मनापासून उत्तरं दिली त्यावरूनच खात्री पटली की आपल्या मनाने मनापासून एखादा वसा स्वीकारला की sky is the limit!</p><p>मिलिंद Teach for India मार्फत जे काम करतोय त्याच्या details लवकरच. सध्या मी दादरमधल्या शिंदेवाडी महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यामाच्या इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक श्रीयुत मिलिंदभैया यांना भेटायचा प्लान करतो आहे.</p><p>श्रीयुत मिलिंदभैय्या, I am proud of you!</p>TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-35346541266340623142009-11-15T04:53:00.000-08:002009-11-15T05:09:36.493-08:00माननीय राजसाहेब<p> </p><p>माननीय राजसाहेब,</p><p>खरं सांगायचं तर आमची पिढी माननीय आणि साहेब ह्या दोन्ही प्रकारांना जुमानत नाही. पण निदान जुजबी ओळख होईपर्यंत जुन्या जोखडांचं वेड पांघरायला आमची ना नाही.</p><p>सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. तुमच्या मनसेचे तेरा उमेदवार विधानसभेवर निवडून आले. अभिनंदन मात्र तुमचंच कारण एक राजकीय पक्ष म्हणून मनसे अभिनंदनास पात्र आहे किंवा नाही हे तुमच्या तेरा आमदारांची कारकीर्दच ठरवेल.</p><p>आम्ही तुम्हाला मनसे जन्माला आल्यापासून नव्हे तर शिवसेनेचा भावी firebrand म्हणून तुमची गणना होत होती तेव्हापासून पाहतोय. कोणत्याही राजकारण्याच्या मागे गतस्मृतींची भुतावळ ही असायचीच. तुम्हीही त्याला अपवाद कसे असणार?</p><p>मात्र मुद्दा तो नाही. आमची म्हणजे तरुण पिढी राजकारण, लोकशाही, देशकार्य या गोष्टींची allergy बाळगून आहे असे नाही तर जिद्दीनं अवघं आकाश कवेत घेणारी आहे. पण त्याचबरोबर बदल या जगण्यास अत्यावश्यक अशा घटकास आम्हास अपेक्षित अशा वेगाने प्रतिसाद न मिळाल्यानं काहीशी स्वार्थी झाली आहे. स्वत:च्या प्रगतीआड येणारी बहुतेक प्रत्येक गोष्ट नजरेआड करुन आजचा किंवा फारतर उद्याचा पण स्वत:चाच विचार करायची आम्ही सवय लावून घेतली आहे.</p><p>मराठीच्या नावानं चांगभलं करून ऐन निवडणूकीच्या मोक्यावर आपला आवाज सर्वांना व्यवस्थित ऐकू गेला. पण जरठ दिग्गजांच्या मांदियाळीत जे तरुणाईचे अंकुर गेल्या दहा वर्षांत देशभरात उगवले त्यात आम्ही तुम्हाला जरूर शोधतो. त्यामुळेच मराठीचा नारा ही निवडणूकीच्या काळाची गरज होती पण आजच्या महाराष्ट्राची गरज त्याहून थोडी अधिक आहे आणि हे आपण जाणता असा विश्वास आम्ही ठेवायचा का तुमच्यावर?</p><p>मुंबई, पुणं, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर वगळलं तरी केव्हढातरी महाराष्ट्र शिल्लक राहतो. आपल्या तेरा आमदारांना हा महाराष्ट्र माहित आहे काय? नंदूरबार, बुलढाणा, रावेर, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, गोंदिया इथेही मराठी लोकंच राहतात आणि आणि प्रगतीची आस त्यांनाही असू शकते हे पक्षाच्या नावातच महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची स्वप्नं दाखविणाऱ्या मंडळींनी विसरू नये. आता गोंदियातल्या विडीचा धूर भरल्याशिवाय भारतात एकही विमान उडत नाही. त्यामुळे नाव जरी मागासलेलं वाटलं तरी प्रगतीची वाट कुठल्याही आडवळणापासून सुरु होते हे विसरून नाही चालत.</p><p>आणि आहे काय हो या मुंबईत जे करायचं शिल्लक आहे अजून? महाराष्ट्र नव्यानेच निर्मायचा असेल तर मुंबईलाही हेवा वाटेल अशी दोन-तीन शहरं विकसित करून दाखवा ना. मला माहित आहे की हे वाक्य लिहायला जेव्हढं सोपं होतं तेव्हढं कृतीत आणायला नाही. पण सुरुवात कोणीतरी करायलाच हवी, नाही का? आणि हो मुंबईला हेवा वाटेल अशी ठिकाणं तयार करायची म्हणजे गर्दी, traffic, प्रदूषण, महागाई एव्हढेच नव्हे. चार मेगामॉल्स उघडले म्हणून कुठलंही शहर आंतरराष्ट्रीय नकाशात नावारुपाला आल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. त्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागते. आणि त्यासाठी आधी मुंबई, पुण्यापलिकडे नजर जावी लागते. आपलीही ती जाईलच अशी अपेक्षा आम्ही ठेवायची का?</p><p>ज्या शिवरायांनी सगळ्या जगाला उत्तम राजशासनाचे धडे दिले त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्या जर बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आतापर्यंत बहुतेकांनी ज्या भीषण समस्यांचा महाराष्ट्राला भेडसावणारे प्रश्न म्हणूनही स्वीकार केला नाही अशा समस्यांची कदाचित उत्तरेही सापडतील. शेतकरी आत्महत्या करतात हे खरं आहे, पण ते आत्महत्या का करतात हे कोणाला माहित आहे का? आणि जर माहित असेलच तर केवळ त्या थांबविण्याचा प्रयत्न न करता त्यांची प्रगती कशी होईल याचा विचार करायला आजवर कोणाला सवडच मिळाली नाही. तुम्ही काढाल का ही सवड? महाराष्ट्रातही नक्षलवादी आहेत याची चिंता आम्ही रोज लोकलचे धक्के खात ऑफिस वेळेवर गाठायच्या घाईत कधी करायची? पण मुळात एका सामान्य माणसाचा नक्षलवादी होण्यापर्यंतचा प्रवास फळास जाईपर्यंत शासनकर्ते कोणता मलिदा फस्त करण्यात मग्न होते हे त्यांनाच माहित पण कधीतरी तुम्हीही अशा गोष्टी हाताळण्यासाठी पावले उचललीत तर मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात यादगार ठराल. अशा कामांना glamour नसतंच पण ती केल्याने लोकांचा विश्वास बसतो. निवडणूकांच्या काळात तिकिटाच्या बारिवर हाच विश्वास धमाल उडवून देऊ शकतो.</p><p>पुन्हा एकदा मराठी, मराठी माणसांच्या मुद्द्याकडे वळू. तुम्ही एक प्रतिथयश businessman आहात. समजा तुम्हाला एखादा महत्त्वाचा project पूर्णत्त्वास नेऊ शकेल अशा माणसाची गरज असेल तेव्हा तुम्ही non-qualified पण केवळ मराठी म्हणून कोणाची निवड कराल काय? कोणी प्रांतीय मक्तेदारी, शिफारसी चालवू पाहत असेल तर त्यास विरोध जरूर करावा पण प्रत्येक वेळीच आंदोलन करतो म्हणलं तर त्याची किंमत काय हो राहिली? ज्या नोकऱ्यांसाठी आंदोलन करायचं त्यासाठी चर्चेत असणारे मराठी तरुण त्या नोकऱ्यांसाठी लायक आहेत का याचा परखडपणे कोणी विचार करतं का? आणि समजा नसतील तर त्यांच्या उन्नतीसाठी कोणी प्रयत्न करतं का? मुंबईत येणाऱ्या so-called बाहेरच्या लोंढ्यात महाराष्ट्रातील माणसेच जास्त असतात. त्यांनाही परत पाठवायचं का मग? पण मुळात मुंबईत यावं लागतं याचाच अर्थ त्यांना पुरेशा संधी त्यांच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. ते कधी व्हायचं आणि कोणी करायचं?</p><p>राजसाहेब, गेल्या बऱ्याच वर्षांत कोणा राजकारण्याला जे जमलं नाही ते तुम्ही करून दाखविलंत. तुम्ही लोकांच्या मनात तुमच्याविषयी अपेक्षा निर्माण केल्यात! या अपेक्षांच्या ओझ्याची ओळख आपल्याला असेलच पण त्या पूर्ण कशा करणार हे रस्त्यावर उतरूनच्या आंदोलनाशिवाय सांगितलेत तर तुम्हाला पाठिंबा नक्कीच वाढेल.</p><p>एक शेवटचं, राहत नाही म्हणून सांगतो. शिवरायांचं साडेतीनशे कोटी खर्चून समुद्रात भव्यदिव्य स्मारक उभारायचं घाटतंय. कोणाची स्वातंत्र्यदेवता पाण्यात उभी म्हणून शिवरायांचं स्मारकही समुद्रात? असल्यांना शिवराय आणि त्यांचा महाराष्ट्र कधी समजलाच नाही. साडेतीनशे कोटी खर्चायचेच असतील तर त्यांत उभा रायगड पुन्हा बांधून निघेल! आहे का तयारी कोणाची? आणि जर नसेल तर जनतेने दिलेल्या करातून गोळा झालेल्या साडेतीनशे कोटींची वासलात जनतेसाठीच लावावी. शिवरायांचा यापेक्षा मोठा गौरव दुसरा कोणता असू शकत नाही.</p><p> </p><p>आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा बाळगणारा,<br />एक मराठी माणूस</p>TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-56034907569762051082009-10-03T05:19:00.001-07:002009-10-03T05:22:04.236-07:00बावनकशी<p><span class=""></span> </p><p>काल पिक्चरला गेलो होतो. Actual पिक्चरबद्दल नंतर बोलू पण सुरुवात कशी झकास झाली त्याबद्दल आधी.</p><p>पिक्चरची सुरुवात राष्ट्रगीताने होते हे काही नव्याने सांगायची गरज नाही. पण राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याची सूचना झाली आणि सगळं ध्यान त्या काळ्या पडद्यावर एकवटते न एकवटते तोवर Black&Whiteच्या एका जबरदस्त शेडमध्ये साक्षात लता मंगेशकर पडद्यावर अवतरली. पांढरीशुभ्र साडी, कानात हिऱ्यांच्या कुड्या, गळ्यातल्या सोनेरी चेनवर मध्यात अडकवलेला छोटासा तिरंगा! एखाद्या ध्यानस्थ योगिनीच्या आविर्भावात तिने जन - गण - मन सुरु केले आणि जगातली सर्वात तेजस्वी तलवार सपकन हवेत फिरवल्यावर जशी तेजाची रेखा हवेत दिसावी तसे ते तिचे सूर दिसू लागले. तापल्या मुशीतून शुद्ध सोन्याची धार ओतावी तसे.</p><p>साक्षात स्वर्गीय.</p><p>पहिली ओळ संपली आणि अस्सल मातीच्या दाणेदार सुरात गीत पुढे सुरु राहिले. आशा भोसले! प्रश्नच नाही.</p><p>राष्ट्रगीत पूर्ण म्हणून होईपर्यंत ह्या दोघी बहिणींनी जी करामत केली तिला तोड नाही.</p><p>ह्या दोघी गात असताना त्यांना पडद्यावर दाखवा किंवा दाखवू नका, पडद्यावर मधुबाला, माधुरी दिक्षित, वहिदा रेहमान, रेखा, हेमामालिनी अशा सुंदऱ्या असू द्यात किंवा नसू द्यात. ह्या बहिणी जेव्हा गातात तेव्हा त्यांचे सूर नुसते ऐकूच येत नाहित तर दिसतातही!</p><p>जय हे! जय हे!</p><p>जय जय जय जय हे!</p>TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-4238926421540671942009-09-19T22:57:00.000-07:002009-09-19T23:00:15.865-07:00भिकेचे डोहाळे २मागच्या पोस्ट्मध्ये जो उल्लेख MUST होता पण मी तो करायचं विसरलो म्हणून हे Addendum.<br />एका मित्राने एक फक्कड जोक ऐकवला होता.<br /><br />एयर इंडियाने म्हणे जाहिरात केली की आमच्याबरोबर प्रवास करा म्हणजे तुम्हाला आईच्या मायेची ऊब मिळेल.<br /><br />प्रवासी म्हणाले की झाडून सगळ्या हवाईसुंदऱ्या आमच्या आईच्या वयाच्या असतात आणि AC बहुतेकदा चालत नसल्याने ऊबही मिळतेच!TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-79882370717948971172009-09-19T08:45:00.000-07:002009-09-19T08:52:11.525-07:00भिकेचे डोहाळे!<p> </p><p>सरकारच्या हवाई वाहतूक खात्याने फतवा काढलाय, म्हणे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी एयर इंडियानेच प्रवास करायचा. कारण काय तर याप्रकारे एयर इंडियास वार्षिक दोन हजार कोटींचा महसूल मिळेल आणि दिवाळखोरीच्या दारात उभी असलेली ही सरकारी कंपनी तगेल.</p><p>भिकेचे डोहाळे यालाच म्हणतात. एके काळी ही एकच कंपनी भारतीयांना विमान प्रवास घडवायची. गेल्या दहाएक वर्षात चित्र पूर्णपणे बदललं. पण तरीही एयर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मुजोरी काही कमी झाली नाही. Ground staff तरिही ठीक आहे पण cabin crew ची निवड मात्र नसानसात भिनलेल्या उर्मटपणाची खात्री पटल्याखेरीज करत नसावेत.</p><p>अपवाद अर्थातच सगळीकडे असतात. एकदा एका हवाई सुंदरीने माझं हसून स्वागत केल्याचं मला नक्की आठवतं. शिवाय ती सर्व्ह करत असलेली कॉफी गार आहे असं सांगितल्यावर चक्क तिनं ती कॉफी गरम करुन वाढली होती! आणि एकदा एका हवाईसुंदराने In-flight entertainment system काम करत नाही म्हणल्यावर आधी ती थोबडावली आणि तरिही ती काम करीत नाही म्हणल्यावर मागच्या सीटवरची सिस्टिम काम करत आहे हे तपासून मग मला तिथे बसण्याची नम्रपणे विनंती केली. माझ्या हातातला मोबाइल फोन पाहून तो अमक्या एका मॉडेलपेक्षा किती चांगला आहे अशासारखे काही smart प्रश्नही विचारले होते. </p><p>अर्थातच हे दोघेही साठीच्या अर्ध्या वयातले दिसत होते. नाहीतर सहसा पन्नाशीच्या आतला चेहरा cabin crew मध्ये कुठनं दिसणार? एयर इंडियाचं दार ओलांडून आत गेलं की काहीवेळा अक्षरश: यमपुरीत entry केल्यासारखं वाटतं. Make-upच्या नावाखाली रंगांचे थर तोंडावर थापलेल्या त्या व्रूद्धा आणि पांढऱ्याशुभ्र केसातून टक्कल दाखवणारे आणि पोट सुटलेले ते जरठ यांचे खडूस चेहरे पाहिले की थोडी भीतीच वाटते.</p><p>एकदा take-offच्या आधी मी खूप तहान लागली म्हणून पाणी मागितलं होतं. त्या साठीच्या सुंदरीने ज्या प्रकारे ते आणून माझ्यापुढे आदळलं तेव्हा तिच्या मनातले ’गिळ मेल्या एकदाचं’ हे शब्द मला स्पष्टपणे ऐकू आले होते!</p><p>तर असल्या ह्या कंपनीला जीवदान देण्याचा प्रयत्न चाललाय त्याला माझा विरोध नाही पण अनिकेत जे काही मला सांगत होता त्यात logic शोधायचा मी बराच वेळ प्रयत्न केला. तो पुढच्या महिन्यात तेहरानला एका conferenceसाठी जाणार आहे. सरकारी तिकिटाने जायचे असल्याने एयर इंडियाने जाणे ओघाने आलेच. आता गंमत अशी की मुंबई - तेहरान असं इराण एयरचं return तिकिट १९ हजारात मिळतं. एयर इंडियाची तेहरानला direct flight नाही म्हणून मग तो आता मुंबई - दुबई एयर इंडियाने आणि दुबई - तेहरान एमिरेट्स, जे एयर इंडियाचे सहकारी flight आहे त्याने जायचा आहे. Return तिकिटाचा खर्च ३८ हजार फक्त! आणि त्याच्या ऑफिसमधून असे एकूण सहाजण जाणार आहेत.</p><p>आता logically विचार केला तर सरकारी म्हणजे पर्यायाने जनतेच्या पाठबळावर चालणारी एखादी कंपनी वाचवताना cost-cutting किती केले? Efficiency किती वाढवली? Quality of service किती सुधारली? ह्या गोष्टींचा विचार करायची गरज आहे असंच मला वाटत होतं!</p>TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-83424397862560913972009-08-22T23:43:00.000-07:002009-08-22T23:45:08.697-07:00नावात काय आहे?<p><br />वांद्रे-वरळी पूलाचे घाटत होते तेव्हा मी शाळेत होतो. मी किती वयस्कर झालोय यापेक्षा ही गोष्ट फार फार वर्षांपूर्वीची आहे हे महत्त्वाचं!</p><p>तर गोष्ट सुरु झाली आणि सर्वांना मुंबईत उद्या सकाळपर्यंत गोल्डन गेट ब्रिज बांधून तयार होईल अशी स्वप्नं पडू लागली. आता आजतागायत भारत वर्षात असला execution speed कोणी पाहिला आहे का? अर्थातच सम्राट अशोक, मुघल सम्राट किंवा अगदी अलिकडचे शिवाजी महाराज अशांचे सन्माननीय अपवाद वगळता. शिवाजीमहाराजांना अलिकडचे म्हणायचा उद्देश एव्हढाच की आज-काल ज्या वेगाने सरकारी कामे होतात त्याने पुढच्या चारशे वर्षात ती नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास वाटतो.</p><p>तर सी-लिंकची कल्पना कोणा महाभागाने एका अशुभ वेळी मांडली आणि बांधकामातले सगळे अडथळे एकदम निर्माण झाले. माहिमच्या समुद्राची पातळी धोकादायकरित्या वाढेल येथपासून ते माहिमच्या खाडीतील मत्स्यजनांना वाईट वाटेल पर्यंत पुष्कळ वाद झाले. एव्हाना मी कॉलेजात जायला लागलो होतो. त्यामुळे आयत्याच फुटलेल्या शिंगांमुळे बहाल झालेली अक्कल पुरती धुंडाळूनही, सी-लिंक बांधायला लायक मंडळी अख्ख्या भारतात नाहित का असा प्रश्न मला पडायचा.</p><p>असो.</p><p>न बांधलेल्या पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि कधीतरी या पूलाचं काम खरंच सुरु झालं. मी चारशे वर्षांचा count-down केव्हाच सुरु केला होता पण महिन्याभरापूर्वी हा ब्रिज चक्क वाहतुकीसाठी खुला झालासुद्धा!</p><p>सोनियाबाई उद्घाटनाला आल्या आणि पवारांनी हलकेच पुडी सोडली, पूलाला नाव राजिव गांधींचं द्यायचं! सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.</p><p>चोवीस तासही उलटले नव्हते बारसं होऊन तर कोणीतरी डरकाळी फोडली, पुलाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुनच ठेवायचं! आता झाली का पंचाईत. एका पुलाची दोन नावं कशी ठेवायची? वांद्र्याच्या बाजुला गांधी आणि वरळीकडच्या टोकाला सावरकर म्हणून प्रश्न सोडवता आला असता पण मग पुलाच्या मध्यात आंबेडकर का नकोत? फुले, सरदार पटेल, नेताजी बोस, रविंद्रनाथ टागोर, मदर तेरेसा, झाशीची राणी यांचं काय मग?</p><p>सगळ्यात मोठी गंमत म्हणजे, सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरणावरुन वाद होऊ नयेत म्हणून अशा ठिकाणांच्या नामकरणासच बंदी करणारा कायदा महानगरपालिकेनं कधीचाच केलाय. सगळे कायदे कोळून प्यायलेले आपले मान्यवर नेते हाच तेव्हढा कायदा विसरले होते काय?</p>TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-36434491816191071192009-07-04T21:40:00.000-07:002009-07-04T21:45:57.791-07:00साधर्म्य-वाचक घटना!नविन गाडी घेतल्यानंतरचा मानसिक प्रवास<br /><br />पहिला महिना - नविन गाडी drive करायची तेव्हा नव्याची नवलाई तर असतेच पण त्याचबरोबर मनात थोडी धाकधूकही असते. नविन गाडीचं shine जसंच्या तसं राखणं हे म्हणजे परम कर्तव्य. गाडीवर एखादा ओरखडाही उठणं म्हणजे एकदम guilty feeling येतं.<br /><br />सहावा महिना - ओरखडा वगैरे ठीक आहे, पण शक्यतो मोठा dent नसावा! अगदी वाईट दिसणारे बरेच ओरखडे झाले तर पुढच्या सर्व्हिसिंगला पेंट करून घेता येतं. पण अगदीच dent असला तर मग खरंच वाईट वाटतं. दुसऱ्याची चूक असली तरीही आपल्याला थोडी जास्त काळजी घेता आले असती ही बोचणी मनात राहते.<br /><br />एका वर्षानंतर - गाडी आहे म्हणजे ओरखडे, dents हे व्हायचंच. पण शक्यतो accidents कसे टाळता येतील हे बघावं. पण ट्रॅफिक किती वाढली आहे आजकाल. बेभरवशाची लोकं कशाही गाड्या हाकणार. मग एखादा येऊन आदळलाच तुमच्यावर तर काय करणार तुम्ही? Damage किती आहे आणि ते कसं manage करता येईल हे पाहणं महत्त्वाचं!<br /><br />लग्न झाल्यानंतर वेळ पाळतानाचा भावनिक प्रवास<br /><br />पहिला महिना - आजतागायत ऑफिसमध्ये सहा वाजता फोन करून घरी किती वाजता येणार आहेस असं कोणी विचारला नव्हतं मला. पण कुठेतरी बाहेर जायचं ठरलं होतं. बरं झालं, आठवण करायला बायको आहे आता. वेळ पाळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं!<br /><br />सहावा महिना - आता चार कामं एकदम करायची म्हणजे वेळ थोडीफार पुढेमागे व्हायचीच. ऑफिसमधून अगदी बाहेर पडताना एक छोटी मीटिंग ठरली तर काय करणार? होम मिनिस्ट्रीबरोबर बाहेर जायची वेळ ठरली असली तरीही थोडा उशीर सगळ्यांनाच माफ असतो. थोडीफार विशेष सत्कार्यं करून ब्राऊनी पॉईंट्स कमावता येतात. ठरवलेला प्लान थोडा पुढे गेला ही बोचणी राहते मनात पण मग पुढच्या वेळी उशीर कसा होणार नाही याची काळजी घेतली की झालं.<br /><br />एका वर्षानंतर - आता सगळ्याच गोष्टी काय तुमच्या हातात असतात का? ऑफिसमध्ये उशीर होणं नेहमीच टाळता येईल असं नाही. परवा तर एक शाळेतला मित्र कितीतरी वर्षांनी भेटला वाटेत, मग गेला थोडा बोलण्यात वेळ. पण हो, अगदी crucial events वेळ चुकवून चालत नाहीत. नाहीतर मग जिवावर बेततं. वाढदिवस विसरणं हा तर जिवावर बेतणारा accident! आणि समजा तस काही झालंच तर damage control कसं manage करता येईल हे पाहणं महत्त्वाचं!TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-37372856960404016772009-02-09T07:05:00.000-08:002009-02-09T07:07:05.538-08:00त्या वळणावरआयुष्यात ती वेळ येतेच. आणि अर्थातच ती काही सांगून येत नाही.<br /><br />त्या एका निर्णयावर म्हणलं तर सगळंच काही अवलंबून असतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर ’हो’ किंवा ’नाही’ देणं हे शिंक आल्यावर शिंकून मोकळं होण्याइतकं प्रत्येक वेळीच शक्य नसतं.<br /><br />आणि ज्या उत्तराने आयुष्याचा डाव मांडला जातो तो प्रश्नच मुळात क्लिष्ट असतो..<br /><br />हो म्हणावं तर अगदी एखाद्या bollywood flick प्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी, शेहनाई आणि palette मधले सगळेच रंग उधळलेले दिसावेत. पण त्याचबरोबर येणाऱ्या जवाबदाऱ्यांचं extra baggage, स्वातंत्र्याला फासलं जाणारं काळं, प्रत्येक गोष्टीत स्वत:शिवाय आणखी एकाचा विचार करायची mandate.. आणि आणखी हजार गोष्टी..<br /><br />पण नाही म्हणायला एखदंतरी logical कारण सापडणं आवश्यक असतं. च्यामारी.. गरजेच्या वेळीच एरव्ही unavoidable असणारं logic कुठे गोते खातं त्या परमेश्वरास ठाऊक.<br /><br />काही गोष्टीतून सुटका नसते हेच खरं!TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-76331635172278808042009-01-29T08:50:00.000-08:002009-01-29T08:51:24.862-08:00एक cool dudeसकाळी सकाळी ऑफिसला पोहोचलो. अजून बॅगही डेस्कवर टेकवली नाही तर नील म्हणाला, ’टॉयलेटच्या दिशेनं बघत रहा, बाहेर कोण येईल बघ.’ आता ही काय Good Morning करायची पद्धत झाली का? पण नाही. त्याला म्हणलं, ’भो***, सकाळी सकाळी चू** बनवायला अजून कोणी मिळालं नाही का?’<br /><br />त्यानं भिजल्या मांजरावाणी चेहरा करत एक emotional dialogue मारला, ’तुझा माझ्यावर एव्हढाही विश्वास नाही का?’ मग उत्तरादाखल मी जोरात हसून दाखवलं त्याला. पण नजर टॉयलेटच्या दिशेनं गेलीच.<br /><br />आणि तिथून साक्षात नंदन निलेकणी बाहेर पडले.<br /><br />मला अगदी कोणा जादूगराने रिकाम्या टोपीतून एकदम जिवंत ससा काढून दाखवावा तसं वाटलं.<br /><br />नीलच्या पाठीत मी जाऊन एक जोराचा धपाटा घातला. आता हसायची वेळ त्याची होती.<br /><br />त्याचं काय झालं होतं की, साहेब आमच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित्त आले होते. ते कॉन्फरन्स रूममध्ये निघून गेले आणि आम्ही गप्पात मश्गूल आणि अफवांना उधाण, Infosys आपल्याला takeover करणार की काय? <br /><br />यथावकाश त्यांची मीटिंग उरकली आणि आमच्या मंडळींनी जाहीर केलं की ते आपल्या employeesनाही address करणार आहेत. मग पुढची वीस मिनिटं एकदम धमाल गेली. किती सहज बोलल्यासारखं बोलले ते. सध्याची परिस्थिती, global slowdown, software क्षेत्राला बसणारे फटके, सत्यम म्हणजे अवघी industry नव्हे, नजिकच्या काळात या क्षेत्राने कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे याचा उल्लेख तर त्यांनी केलाच पण त्याही पलिकडे जाऊन आपला देश, नक्की कोणत्या बाबींमुळे आपल्याला advantage मिळतो आहे, मिळणार आहे, तरुण पिढी कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत, ब्रेन ड्रेन वाईट का नाही, ideas महत्त्वाच्या का असतात. एक ना अनेक, केव्हढ्या गोष्टींचा किती सहज उल्लेख केला त्यांनी. Industry leaders ही ओळख सार्थ करून दाखवणं किती सहज जमतं या लोकांना. आणि हो, जाता जाता आपल्या नविन पुस्तकाचा उल्लेख करण्यासही विसरले नाहीत ते.<br /><br />एकदम cool dude!<br /><br />I really wish if one day, some day I could be like them!!TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-69082342913380556522008-12-21T02:13:00.000-08:002008-12-21T02:25:00.573-08:00माकडाच्या हातात शॅंपेनशाहरुख खानला मी माकडापेक्षा अधिक मानत नाही. जेव्हा तो एखादा सणसणीत performance देतो (कभी हा कभी ना, चक दे वगैरे) किंवा एखद्या मुरलेल्या businessman प्रमाणे वागतो (IPL मध्ये त्याच्याच टीमने सर्वात जास्त नफा कमावला होता!) तेव्हा त्याला उत्क्रांतीमध्ये इतर प्रजातींपेक्षा अधिक प्रगती केलेल्या माकडाइतकाच मानतो!<br /><br />थोडक्यातच सांगायचं तर स्वत:च्या पैश्यांनी मल्टिप्लेक्सचं महागडं तिकिट काढून शाहरुख नावाची तीन तासांची डोएकेदुखी पदरात पाडून घेणाऱ्यातला मी नक्कीच नव्हे. पण माझ्या टीमने मोठ्या उत्साहाने ’रब ने..’चा प्लान बनवला होता त्यामुळे यावेळी बचाव शक्य नव्हता. आणि शेवटी जे व्हायचे ते झालेच. अनुष्का शर्मा नामक कमनीय बांध्याच्या आणि बऱ्यापैकी बोलका चेहरा असणाऱ्या कुडीसमोर म्हातारा शाहरुख त्याच्या ठराविक त्या पाट्या टाकतो आणि ते तीन तास असह्य करतो.<br /><br />अनुष्का शर्मा, जी आधी खूप impressive वाटते, ती वेष बदललेल्या माकडाला ओळखायला तीन तास घेते, म्हणजे ती काही ’सगळ्या सुंदर मुली मठ्ठ असतात’ ला अपवाद ठरत नाही. मुळात ती नव्या रुपात आलेल्या cheap शाहरुखच्या प्रेमात पडूच कशी शकेल हा प्रश्ण ना तिला पडतो ना दिग्दर्शकाला. आदित्य चोप्राकडून एव्हढ्या पोकळ अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण शाहरुखला assume केल्यामुळे दिलवाले...चा हा दिग्दर्शक साफ fail गेला आहे.<br /><br />मला इथे काही चित्रपट परिक्षण लिहायचं नाहिये. पण राहून राहून नुकत्याच एका ’आंखो देखा’ love triangle ची आठवण येते आहे. तो देखणा, हुशार, खानदानी, उत्तम sense of humour असणारा. तीही सुंदर, ambitious आणि lively. आणि तिसरा कोन अर्थातच त्या शाहरुख-सामाईकचा. ती आणि शाहरुख एकाच departmentमध्ये होते आणि आपल्या असली heroची entry होण्या आधी किमान एक वर्ष एकमेकाला ओळखत होते. पण आपला hero आणि ती यांचं understanding अगदी बघण्यासारखं होतं. Cross-departmental functioning दोघंही इतक्या smoothly handle करायचे की क्या बात है! आणि शाहरुख केवळ street-smart, qualification - हुशारी यात आपल्या heroच्या पासंगालाही न पुरणारा.<br /><br />पण त्याची fielding लाजवाब असणार यात शंकाच नाही. गेल्या रविवारी तिचं आणि त्या so-called शाहरुखचं लग्न झालं. ऑफिसमधून आम्ही सगळे गेलो होतो. आपला heroसुद्धा होता, अगदी comfortable.. व्यक्त न केलेल्या भावना सहज लपवून टाकत असावा किंवा बाकीच्यांनाच त्या दोघांच्या होऊ शकणाऱ्या गोष्टीत खूप जास्त interest होता.<br /><br />काही असो मला मात्र रब ने.. पाहिल्यावर तिची आठवण आली. अमिताभ समोर असताना कोणी शाहरुख prefer करतं का? या मुलींची हीच गोष्ट मला समजत नाही बुवा. <br /><br />Anyway, गोष्टीतल्या तिघांनाही मी अगदी जवळून ओळखतो त्यामुळे मी तिघांचही चांगलच व्हावं असं म्हणणार पण प्रश्ण मात्र मनात राहिलच, प्रेम खरंच आंधळं असतं की या गाठी वरच बांधलेल्या असतात..TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-79069474332608411382008-11-22T23:29:00.000-08:002008-11-22T23:31:04.955-08:00इंडिया शायनिंगकाल ऑफिसला जाताना गाडी सिग्नलवर थांबली होती. हा सिग्नल भीक मागणारे भिकारी, काहीतरी विकायचा प्रयत्न करणारे भिकारी, तृतीयपंथी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि हो, वाहनांसाठी हिरवा सिग्नल चालू असताना रस्ता क्रॉस करायसाठी धावणाऱ्या माणसांसाठीही अर्थातच!<br /><br />तर गाडी थांबली आणि पुढचे वीस सेकंद काय कारायचं म्हणून इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. शेजारीच एक बाईक येऊन थांबली. चालवणारा आपला देसी dude च होता. भर उन्हात काळ्या गॉगलबरोबरच लेदर जॅकेटही घातलं होतं त्यानं. असले प्रकार सहसा हास्यास्पदच असतात.<br /><br />पण त्याच्या इतक्या सजण्या-सवरण्याचं कारणही त्याच्या मागेच बसलं होतं. कारण एक सुंदर गौरांगना होती. फॉरेन मेड सुंदरी! मी मनात म्हणलं, नशिब आहे साल्याचं, तेव्हा घालेना का लेदर जॅकेट भर उन्हात..<br /><br />बाईक थांबली म्हणून लगेच त्या दोघांचं कूजन सुरु झालं आणि मधुर प्रसंगात एका तृतीयपंथीयाने एन्ट्री घेतली, अगदी कमला का हमला स्टाईलमध्ये!<br /><br />पहिली जोरदार टाळी वाजली आणि आजूबाजूच्या किमान पन्नासजणांना ऐकू जाईल अशा आवाजात कमलानं तिला (किंवा त्याला) पैसे दिल्यास देसी dude आणि फिरंगी ललना यांचा संसार कसा सुखाचा होईल, त्यांची मुलं कशी सुखात वाढतील याचा पाढा वाचायला सुरुवात केली. आपला dude कमलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असतानाच विदेशी सुंदरीच्या चेहऱ्यावरील भाव आश्चर्यमिश्रित धक्क्यापासून कुतूहलमिश्रित ’आता करु तरी काय’ पर्यंत तीन सेकंदात बदलले. <br /><br />पण तिनं वेळ न दवडता आपल्या छोट्याश्या बॅगमधून अगदी छोटासा कॅमेरा काढला आणि पटकन कमलाचे दोन-चार फोटो काढले. कमला जातिवंत अदाकारा त्यामुळे शेवटच्या फोटोला तिनं (म्हणजेच त्यानं) ठेवणीतलं हास्य टाळी मारतानाच्या पोजबरोबर दिलं. विदेशी ललना एकदम खुष!<br /><br />सिग्नल सुटायची वेळ झाली होती त्यामुळं प्रकरण इथेच संपेल असं वाटतानाच कमलानं पदराखालून मोबाईल काढला आणि मोबाईलवरच्या कॅमेऱ्यावर त्या दोघांचे दोन-तीन फोटो काढले!<br /><br />आपला dude एकदम चूप. आणि विदेशी पाहुणी आत्ता नक्की काय झालं याचा अदमास लावण्यात गुंतली. एवढ्यात सिग्नल सुटला आणि कमला मोबाईलवर बोलत क्रॉस करून निघून गेली.<br /><br />बाईक वेगात पुढे जात होती पण विदेशी सुंदरी काही मागे वळून पहायची थांबत नव्हती.<br /><br />India is shining boss!TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-61472794063509643692008-11-16T08:51:00.000-08:002008-11-16T08:58:46.910-08:00तीन दिवसात दोन पुस्तकंगेल्या तीन दिवसात मी दोन पुस्तकं वाचून काढली.<br /><br />गेले काही दिवस (किंवा महिने.. वर्षं म्हणलं तरी चालेल) वाचायला वेळच मिळत नव्हता. वाचायसाठी वेळ न मिळणं हे मला खूप अपमानास्पद वाटतं. वाचायसाठी का वेळ काढावा लागतो? पण रोजचं वर्तमानपत्र वाचणं वेगळं आणि एखाद्या पुस्तकात डुंबणं वेगळं. <br /><br />खूप दिवस नाही काही वाचलं की आजारी असल्यासारखं वाटायला लागतं. मी काही खूप मोठा रसिक किंवा चोखंदळ वाचक आहे का ते माहित नाही पण वाचकाला काही जात नसते. आणि त्यातही मी हातात पडेल ते वाचतो. केवळ थोर साहित्यिकांचेच सारस्वत लागतं किंवा नवसाहित्याशिवाय तरणोपाय नाही असल्या भानगडी मला सुचत नाहीत. प्रवासात वाचायला अजिबात वेळ मिळणार नाही ही माहित असूनही मी एखादं पुस्तक बरोबर ठेवतो, मग जरा बरं वाटतं.<br /><br />तर तीन दिवसात दोन पुस्तकं. <br /><br />दिवाळीमुळे तीन दिवस सलग सुटी होती. त्याआधी संध्याकाळी घरी येताना त्या स्पेशल रद्दीवाल्याच्या दुकानावरून आले. ह्याच्याकडे सगळी पुस्तकं स्वस्तात मिळतात. पायरेटेड प्रिंट्स असोत किंवा कोरी ओरिजिनल, ह्याच्याकडचा रेट सगळ्यात कमी. शिवाय हा वाचून झालेलं पुस्तक पुन्हा विकत घेतो, अर्थातच पैसे आणखी थोडे कमी करून. म्हणून मग One Night at Call Center आणि Five Point Someone उचललं.<br /><br />ह्या चेतन भगतचा एव्हढा hype झाला आहे की पुस्तक तितकं चांगलं असेल का हा प्रश्ण मनात होताच. घरी आल्यावर हातात पहिल्यांदा Five Point Someone आलं म्हणून तेच वाचायला सुरुवात केली.<br /><br />हरी, रायन आणि आलोक या तिघांची ही गोष्ट. शिवाय अस्सल उपपात्रंही बरीच. गोष्टीचा plot झकास आहे मात्र चेतन भगतची गोष्ट सांगण्याची पद्धत काही जेव्हढी खरी वाटते तेव्हढीच ती काही वेळेस तद्दन खोटी वाटते, ओढून-ताणून मांड मांडल्यासारखी. म्हणूनच ती अगदी जवळची वाटता वाटता अनोळखी वाटतात. हरी, ज्याच्या तोंडून सगळी कथा सांगितली जाते, तोच इतकं हातचं राखून बोलतो की गोष्टीचा ३६० degree view हवा असेल तर, Five Point Someone, by Ryan आणि Five Point Someone, by Alok वाचावं लागेल. पात्रांची authenticity जर जपता आली नाही तर गोष्टीचं भजं व्हायला कितीसा वेळ लागणार? पुस्तक मस्त आहे पण great वगैरे अजिबात नाही.<br /><br />One Night at Call Center ही तर एक fantasy. कॉल सेंटरचा डोलारा चेतननं नक्कीच छान उभा केलाय पण त्यातला नायक श्याम - जो ही गोष्ट सांगतो तो अगदी सामान्य असतो. पण नायकाचं सामान्यत्व उभं करताना लेखकाला असामान्य कामगिरी जमली तरच पुस्तक great होतं हे कोणीतरी भगतसाहेबांना सांगायला हवं. त्याने प्रयत्न मनापासून केलेला आहे पण तो प्रयत्न आहे हेसुद्धा जाणवतं. आणि म्हणूनच मला हेही पुस्तक काही खल्लास वाटलं नाही. <br /><br />पण काही प्रसंग, काही जागा टाळ्या नक्कीच घेतात. अस्सल माणसांची अस्सल दुनिया मोठी अजब असते महाराजा, मग त्यातली साम्यस्थळं दिसली की तोंडातून शिटी येणारच ना!<br /><br />चेतनचं Three mistakes of my life नाही वाचलं अजून. पण तेही जर याच वळणावर जाणारं असेल तर मात्र त्याला ’व्यक्ती आणि वल्ली’ भेट देईन म्हणतो, home work करायला - माणसं कशी चितारली जातात ह्याचं detailing समजवायला.<br /><br />दिवाळीचं celebration करून तोंडी लावायला पुस्तकं छानच होती. मुख्य म्हणजे एकेका दिवसात संपणारी. त्यामुळे अख्खं पुस्तक एका दिवसात संपवलं हे समाधान. आता बिल गेट्सचं ’The Road Ahead’ आणून ठेवलंय. But any suggestions?TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-51778870285914472322008-11-15T03:06:00.000-08:002008-11-15T03:07:05.038-08:00बचेंगे तो Monday भी मिलेंगे"बचेंगे तो और भी लढेंगे" असं कोणीतरी ऐतिहासिक पुरुष म्हणून गेला होता.<br /><br />किंवा कोणी पुरुषीही म्हणाली असेल. आता स्त्रीला पुरुषी का म्हणत नाहीत हा वादाचा मुद्दा आहे आणि मी वादात पडत नाही. तसं लहानपणी मला, विदुषी हे विदुषकाचे स्त्रीलिंगी रूप आहे असं वाटायचं. असो..<br /><br />तर मुद्द्याची गोष्ट म्हणजे, बचेंगे तो और भी लढेंगे हे आत्ताच आठवायचं कारण म्हणजे सध्याची जागतिक परिस्थिती!<br /><br />लेहमन बंधूंनी स्वत:चीच अब्रू स्वत:च्याच हाताने वेशीवर टांगली आणि बॉलीवूडमध्ये Item Songs करायला so called मादक ललनांची रांग लागते तशी मोठमोठ्या अर्थसंस्थांची स्पर्धा सुरु आहे. शेयर बाजाराचा विषय काढला की तर माझ्या काळजात एक स्पष्ट कळ उमटते. उत्साहाच्या भरात लाखाचे बारा हजार नाहीत (माझ्याकडे कुठले लाख रुपये असणार शेयर बाजारात फुकायला) पण बारा हजाराचे बाराशे नक्कीच झाले आहेत. म्हणजे नुकसान जरा जास्तच.<br /><br />विप्रो, इन्फोसिस वगैरे मंडळींनी निरोपाचे नारळ देताना नारळांची खरेदी घाऊकरित्या केल्याचं ऐकलं आणि आमच्या गोटातही थोडा काळजीचा सूर उमटला. जेमतेम तीनशे साडेतीनशे लोकं असताना आपली कंपनी नारळ खरेदीच्या भानगडीत पडणार नाही असं स्पष्ट मत नीलनं मांडलं होतं. काढायचंच असेल तर त्या निकम्म्या परप्रांतीयाला का काढू नये असंही एका मराठी बांधवाचं मत पडलं. विशालचा मात्र जो तो आपल्या कर्माने येतो आणि जातो यावर गाढ विश्वास! त्याने असं म्हणल्यावर सगळ्यांचीच हवा टाईट. कारण नेमकं कोणतं कर्म यावेळी आडवं येईल याची गॅरंटी नाही.<br /><br />दबक्या आवाजातल्या चर्चांना तोंड फुटलंय आणि गॉसिप कॉलम भरून वाहतोय. त्यातच एकाला नारळ मिळाल्याची पक्की खबर आहे. उडत्य्या पाखरानं आणखीही काही नावं कानात सांगितली आहेत. तेव्हा शुक्रवारी निरोप घेताना हेच म्हणणं क्रमप्राप्त आहे,<br /><br />बचेंगे तो Monday भी मिलेंगे!TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-40977566313641271312008-09-29T10:30:00.000-07:002008-09-29T10:45:55.680-07:00पाच मिनिटांची अस्वस्थताडेड्लाईन्स कोणत्याही प्रोजेक्टच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. आणि मी ज्या प्रोजेक्टबद्दल बोलतोय, तो मी कधीही विसरणार नाही.<br /><br />त्याला कारणंही बरीच आहेत. प्रोजेक्ट सुरु झाला तेव्हा मला नविन ऑफिस जॉइन करून एक-दीड महिनाच झाला होता. एकूण कामाचं स्वरूप पाहता बरीच मेहनत करावी लागणार होती. ऑफिसमधील सगळी थोर मंडळी बऱ्याच मोठ्या रिझल्ट्सची अपेक्षा ठेवून होती. त्यातून मी नविन म्हणजे ही मंडळी दर थोड्या वेळानी मला मायक्रोस्कोपखाली घालायची. शिवाय ’इन-हाउस’ टीम नाही म्हणून हे काम बाहेरच्या एका कंपनीला आउट-सोर्स केलेलं. आणि त्यातच मोठा झोल झाला.<br /><br />सुरुवातीचे काही दिवस मोठ्या उत्साहात काम झालं आणि ती ऐतिहासिक माशी शिंकली! ज्या कंपनीला काम आउट-सोर्स केलं होतं ती मंडळी पाट्या टाकताहेत हे एव्हाना लक्षात आलंच होतं, पण कामाचा दर्जा, वेग सगळ्याच बाबतीत त्यांनी असे काही रंग दाखवायला सुरुवात केली की मला घाम फुटला. प्रोजेक्ट मॅनेजर बहुतेक वेळा गायब असायचा, त्याची पोरं काम करायला तयार असायची पण त्यांची अवस्था सेनापती घायाळ झालेल्या सैन्यासारखी होती. एव्हीतेव्ही धावायचंच आहे तर वाट फुटेल तिथे धावायचं असं त्यांचं साधं लॉजिक.<br /><br />नीलशी वेगवेगळ्या तऱ्हेने बोलायचा मी खूप प्रयत्न केला पण पठ्ठ्या तोंड उघडायला तयार नाही. त्याच्यावर असणारं टेंशन दिसत होतं पण तरीही सारं काही आलबेल आहे असं दाखवायचा त्याचा प्रयत्न होता. शेवटी एक दिवस माझाही कडेलोट झाला. मी त्याला फोन करून मजबूत शिव्या घतल्या. तोही काही मूर्ख नव्हता. मी काय बोलतोय हे त्याला समजत होतं. पण माझ्या आरडाओरड्याचा एकूण कामावर काही फारसा फरक पडला नाही.<br /><br />मग मी संकल्पला धारेवर धरलं. हा नीलचा बॉस, सिनियर पार्टनर. त्याला केलेल्या काही कॉल्सवर तर मी अगदी ’दिल की भडास’ बाहेर काढली होती.... परिस्थिती फारच हाताबाहेर जायला लागली तेव्हा मी सरळ त्यांच्या टीमबरोबर डायरेक्ट काम करायला सुरुवात केली. येनकेन प्रकारेण प्रोजेक्ट उरकला पण त्यानंतर मी त्यांना एकही काम दिलं नाही. हे काम एप्रिलमध्ये संपलं आणि ही मंडळी ऑगस्टपर्यंत इनव्हॉइस पाठवायलाही विसरली होती. मी माझ्या कलीगला म्हणलंही होतं की केलेल्या कामाचा मोबदला मगणंही ज्यांच्या लक्षात रहात नाही त्यांच्याकडून professionally कोणतीच अपेक्षा करु नये..<br /><br />मागच्या आठवड्यात शेवटचा इन्व्हॉइस क्लियर केला तेव्हा नीलबरोबर एक छोटी मीटिंग झाली. माझ्या कलीगशी बोलता बोलता तो सहज म्हणला की संकल्पची गाडी आता थोडी रूळावर येत आहे. माझ्या तोंडावरचं प्रश्नचिन्ह त्यानेही वाचलं असावं. मीटिंगनंतर मी माझ्या कलीगला रूळावरच्या गाडीचं रहस्य विचरलं. तो म्हणाला आपला प्रोजेक्ट सुरु झाला त्याच सुमारास संकल्पला मुलगा झाला आणि तो जन्मत:च मूकबधीर होता.. संकल्पसाठी हा अनपेक्षित धक्का त्याला almost depression मध्ये घेऊन गेला. याची परिणिती तो पूर्णपणे कामाबाहेर जाण्यात आणि त्यामुळे कामाची सगळी जबाबदारी त्याच्या नवशिक्या टीमवर येऊन पडली..<br /><br />खोटं कशाला बोला पण त्या दोघांना त्या bad days मध्ये झापताना कुठेतरी मोठ्ठा तीर मारल्याचं समाधान मिळालं होतं, त्याची जागा एकदम एका विचित्र guilt नं घेतली..<br /><br />मी इतका वाईट कसा वागू शकतो? काहीतरी चुकतंय हे दिसत असताना मी त्याचं खरं कारण शोधायचं सोडून आपलंच घोडं पुढे दामटत होतो.<br /><br />माझ्या कलीगला ही गोष्ट माहीत होती. त्याने मला ती का सांगितली नाही मला नाही माहीत.<br /><br />मी ज्याला कामचुकारपणा समजत होतो त्यामागे काही वेगळी कारणं होती. अर्थातच समजण्यासारखी.<br />आपण केलेली गोष्ट चूक होती हे सिद्ध झालं की ती guilt माझ्या मनात घर करून राहते. Professionally मी काही मोठी चूक नसेलही केली पण तरीही.. कुठेतरी ते सलत राहतं.<br /><br />Anyway, मी याला पाच मिनिटांची अस्वस्थता म्हणतो. कारण त्यातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतरच नसतं.TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-22938110028236745502008-08-25T10:50:00.000-07:002008-08-25T10:52:55.382-07:00’क्ष’ची गोष्ट<p><br />क्ष एक नंबरचा कामचुकार आहे.</p><p><br />क्षशी पहिल्यांदा भेट झाली तेव्हा तो बऱ्यापैकी ठिकठाक वाटला होता. आम्ही एकाच टीममध्ये काम करणार असं ऐकताना माझाच उत्साह जरा जास्त होता.</p><p>मग कामाचं रुटीन सुरु झालं. हळूहळू माणसं, कामं आणि त्या माणसांच्या काम करायच्या पद्धती सगळं काही जवळून पहायला मिळालं. आणि तेव्हाच हा क्ष अगदी अंतर्बाह्य बघायला मिळाला.</p><p>दिवसाची सुरुवात केवळ पेपर वाचूनच करावी असं काही नसतं तर ती वेगवेगळ्या न्यूज-साईट्सवर व्हिडीओ पाहूनही करता येते असं त्याला वाटतं. </p><p>जीमेल, रेडिफ़्फ़ आणि याहू यांची निर्मिती देवाने दिवसभर माणसाला काहीतरी चालना मिळावी म्हणून केली आहे असं त्याला वाटतं. जरा विचार करून बघा, एकच मेल सर्विस दिवसातून शंभर वेळा चेक करायला किती कंटाळा येईल? पण तीन मेल सर्विस निर्माण करून देवाने विश्वनिर्मितीत कितीतरी वैविध्य आणले आहे.</p><p>व्हिडिओ पायरसी करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं त्याला वाटतं. आणि त्यासाठी ऑफिसची बॅंडविड्थ वापरणं म्हणजे पुण्यकर्म आहे असंही त्याला वाटतं!</p><p>चोरून डाउनलोड केलेले सिनेमे सगळ्यांना वाटणं आणि ऑफिसच्या डीव्हीडीजवर हे सिनेमे बर्न करून घरच्या डीव्हीडी प्लेयरवर पाहणं हेसुद्धा तितकच महत्त्वाचं आहे यात त्याला कोणतीही शंका नाही.</p><p>आपला सिनियर आपल्याच काहीच न करण्यानं वैतागतो आहे असं लक्षात आल्यावर काहीतरी थातूरमातूर डिटेल्स सांगून त्याच्या तोंडाला पानं पुसण्यात क्षचा हात कोणीही धरू शकत नाही.</p><p>आपण कंपनीत दुसऱ्यांपेक्षा थोडा जास्त वेळ आहोत याचा उपयोग नवीन मंडळींना करून देताना त्यांना साठ टक्के बिनचूक माहिती आणि चाळीस टक्के केवळ चुकीची माहिती देणं त्याला आपण न करत असलेल्या कामापेक्षाही जास्त महत्त्वाचं वाटतं.</p><p>देशविदेशात होणाऱ्या विविध परिषदा आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतो या दोन गोष्टींचा दूरान्वयेही संबंध नसला तरी त्यात उपस्थित राहता यावं म्हणून प्रयत्न करणं हा सेल्फ-इनिशिएटिव्ह्चा भाग आहे असं त्याला वाटतं.</p><p>कोण जॉब बदलणार आहे, कोणाला किती पगारवाढ मिळाली, कोण कोणत्या राजकारणात किती सक्रीय आहे, पाय खेचण्याच्या शर्यतीत ’अ’ने ’ब’ला नक्की काय केले तर ’ब ’चा पुरता बीमोड होईल, ’क’ला हैराण करण्याचे पंच्याऎशी प्रकार...असल्या कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्याचे एकच ठिकाण, क्ष!<br />फारसं काहीच न करता प्रचंड व्यस्त असल्याचा आव आणता येतो तुम्हाला? ’क्ष’ला जाऊन भेटा.</p><p>इतके सदगुण एकाच ठिकाणी साचलेली व्यक्ती या कलियुगात मिळणं तर कठीणच आहे. </p><p>मीच काय तो पामर, इतक्या दिवसात फारसं काही शिकू शकलो नाही. </p><p>आणि हो, चार दिवसांचं काम सहा महिन्यात पूर्ण न करून आपल्यावर असलेल्या कामाच्या ओझ्याची सांगोपांग चर्चा तुम्हाला करता येते? आता मात्र ’क्ष’शिवाय तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही.</p>TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-19600494411365274632008-06-15T05:50:00.000-07:002008-06-15T05:58:55.019-07:00जाने कहा गये वो दिन...पोस्टला अशी फिल्मी नावं दिली की वाचणाऱ्यांच्या अपेक्षा एकदम वाढतात. पोस्ट क्लासिक असण्याची शक्यता शून्य असली तरी निदान ते एखाद्या ’क्लासिक’वर असेल अशी आशा असते. ही आशाही फोल ठरेल हे मी आधीच सांगतो. नंतर मग वाचकांच्या पत्रांची (कमेंट्सची!) मारामारी नको. खरंतर वीकेंड संपत आला आहे आणि दोन दिवस पूर्ण वाया घालवल्यावर जे एक चमत्कारिक नैराश्य येतं त्यामुळे असेल.. किंवा शून्यातून नाविन्य निर्माण करणारे न्यूज चॅनेल्स जरा जास्त बघितल्यामुळेही असेल.. पण हे पोस्ट लिहिणं हा वेळेचा निव्वळ अपव्यय आहे. आणि तुम्ही अजूनही वाचत असाल तर तुमच्या हिंमतीची दाद देतो आणि तुमचा वेळही नक्की वाया जाईल याचीही खात्री देतो!<br /><br />तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे उशीरा उठलो. आता रविवारी सकाळी जाग आल्यावर किमान अर्धा तास तरी बिछान्यात लोळत पडणे क्रमप्राप्त असते. आणि नेमकी याच वेळेस ’recent times’मध्ये केलेल्या पापांची उजळणी मनातल्या मनात सुरु होते. गेले दोन-तीन महिने मी नक्की काय-काय केलं हे आठवतही नाहिये. म्हणजे सकाळी उठलो, दात घासले, आंघोळ केली वगैरे वगैरे झालंच. पण वर्षाच्या सुरुवातीला चुकून <a href="http://aaraspaanee.blogspot.com/2008/03/blog-post_29.html">एक यादी </a>बनवली होती, ती आठवली आणि स्वत:चाच राग आला. अर्थातच त्या यादीतल्या अनेक गोष्टींचा पत्ता नाहिये आणि त्याला बऱ्याच अंशी माझा बॉस जबाबदार आहे.<br /><br />आता यात बॉसचा काय संबंध असला illogical प्रश्न विचारू नका. कारण उद्या तुर्कस्थानात एखाद्या अमेरिकन प्रवाशाला बनावट चायनीज वस्तू विकताना बिहारी भैय्या गजाआड गेला तर त्या घटनेशीही बॉसचा संबंध लावता येऊ शकतो! मग माझे गेले दोन-तीन महिने, तेराव्या शतकात आफ्रिकेतून विकत घेतलेल्या गुलामांची डचांनी पिळवणूक करावी, तशी अवस्था करणारा माझा बॉस... जरा अति होतंय..<br /><br />पण आईशप्पथ, ह्या काळात असे काही अनुभव घेतले की मझा आ गया! वाटलं आयुष्य आयुष्य म्हणतात ते हेच. पराकोटीचा गोंधळ, उच्च्वर्गियांच्या (upper management) अपेक्षा, कामचुकार सहकारी, कामं उरकताना होणारी दमछाक, औत्सौर्चे केलेलं काम पूर्ण करून घेताना ’ही मंडळी वन टू का फोर’ का करतात असे पडणारे प्रश्न, न मागता मिळालेले आणि तितकेच बिन-उपयोगी सल्ले... यादी न संपणारी आहे. पण याबरोबरच न चुकलेल्या डेड्लाईनचा आनंद, ऐनवेळी सहकारी-मित्राने केलेली मदत, वरवर खडूस भासणऱ्या डिपार्टामेंट हेडने आपणहून दिलेली मी केलेल्या कामाची पावती, काही नविन मित्र (की ज्यांच्यामुळे काम करताना तर मजा येतेच पण शीण आणणाऱ्या मंडळींचा त्रासही सुसह्य होतो!) यामुळे इथे आठ महिने कसे गेले कळलेही नाही. सध्या मी फक्त एव्हढंच म्हणतो आहे की,<br /><br />Probation संपले, Confirmation जाहले।<br />Appraisal कधी होणार, देव जाणे॥<br /><br />नव्या नोकरीत जीवतोड मेहनत करून बऱ्यापैकी काळ लोटला की केलेल्या कामाचे appreciation कसे होईल (किंवा होणार की नाही), future growth कशी मिळेल असे प्रश्न पडतातच. I hope you understand what I mean.<br /><br />मग या सगळ्यातून जाताना ब्लॉगकडे बघायला वेळच मिळाला नाही. तसा मी काही नियमितपणे डायरी लिहिणाऱ्यातला नाही. डायरी लिहिणं मला कायमच थोडं formal वाटायचं. कोणाला शिव्या घालायच्या असतील किंवा मनातली मळमळ बाहेर काढायची असेल, तर ते हाताने लिहून काढणं हे आणखी एक पाप केल्यासारखं. पण computer वर सगळी पापं माफ. शिवाय पोट साफ झाल्यावर मन कसं फुलपाखरासारखं हलकं होतं तसंच feeling येतं.<br /><br />काही गोष्टींवर खरंच लिहायचं आहे तर काही पोस्ट्स अर्धवट लिहून पडले आहेत. शिवाय बॉसकडून गुलामांची पिळवणूक हा साथीचा रोग जगभर पसरला असावा कारण मी ज्यांचे ब्लॉग्स नेहमी वाचतो त्यांनीही बरेच दिवसात काहीच लिहिलेलं दिसत नाही. सगळ्यांनाच आणि एकाच वेळी नवसाहित्यनिर्मितीचा उबग येणं शक्य नाही. म्हणजे पुन्हा, ’तेराव्या शतकात आफ्रिकेतून विकत घेतलेल्या गुलामांप्रमाणे.....’. आणि असं जर काही नसेल, तर मंडळी पुढचं पोस्ट कधी टाकताय?TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-27238275313779005822008-03-29T21:31:00.000-07:002008-03-29T21:36:37.474-07:00आणखी एक यादीनविन वर्ष सुरु होताना नविन resolutions करणं मला फारसं मानवत नाही. पण गेल्या वर्षीचा डिसेंबर काही अशा घटनांचा होता की मी खरंच विचारात पडलो.<br /><br />गेली काही वर्षे, आला दिवस साजरा करण्यातच मी इतका बिझी झालोय... म्हणजे जॉब एकदम मजेत चाललाय. (जेव्हा तो कंटाळवाणा होतोय असं वाटलं तेव्हा तो बदललाही होता.) काम interesting आहे. शिवाय ते भरपूरही आहे. सोमवार उजाडला की शुक्रवार कुठे संपतो ते कळतही नाही. रोज सकाळी उठायचं, जमेल तेव्हा जिमला हात लावून यायचा, ऑफिसला पळायचं. मग दिवसभर कधी मजेत तर कधी एकदम धावपळीत काम एक्के काम. बॅकग्राउंडला गाणी-गप्पा चालू असतात, पण ते तेव्हढ्यापुरतच. संध्याकाळी घरी आलं की थोडावेळ टीव्ही, जेवण, कधी काही वाचलं तर नाहीतर एकदम झोप.<br />हे काय life आहे?<br /><br />म्हणजे करियरचे प्लानिंग वगैरे चालुच असतं. त्यापासून कधी सुटका नसतेच.<br /><br />दोन वर्षांपूर्वी गिटार शिकायला सुरुवात केली होती. नक्की कधी बंद पडली, आठवतच नाहिये. शेवटचं पुस्तक बहुतेक The monk Who Sold his Ferrari. ते पण अर्ध्यातच सोडलं होतं. बरंच फिल्मी वाटलं होतं. पुस्तक हातात पडल्यावर ते अधाश्यासारखं संपवण्यातही एक मजाच असते. पण आपण काय करू शकतो यापेक्षा आणखी काय काय करता येईल ही गोष्ट मला जास्त exciting वाटते.<br /><br />म्हणजे असं नाही की, एक ना धड भाराभर चिंध्या.<br /><br />पण I like to push myself to limits.<br /><br />आणि यासाठी मी काहीही करत नाहिये हे डिसेंबरमध्ये लक्षात आलं.<br /><br />दिवस भुर्रकन उडून जातात आणि मग हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, असं स्वत:लाच torture करणं सुरु होतं. मग त्यापेक्षा आळस झटकून काहीतरी productive का करू नये असा किडा डोक्यात वळवळला आणि खरी मजा सुरु झाली. थोडक्यात काय काय करायचं आहे याची यादी बरीच मोठी आहे.<br /><br />पण काही गोष्टी या वर्षात करायच्याच असं ठरवलंय. त्यातल्या काही गोष्टी अशा..<br /><br />गिटारवरची धूळ पुन्हा एकदा झटकायची.<br /><br />एखादी नविन भाषा शिकायची.<br /><br />कुठेतरी फिरायला जायचं. नवा गाव किंवा नविन देश! (हे जरा जास्त होतंय आता)<br /><br />टेक्नॉलॉजीमध्येच बरंच काही वाचायचंय.<br /><br />नियमितपणे काहीतरी लिहायचं.<br /><br />गाणंही शिकायचंय. (पण प्रत्येक वेळी मी माझाच आवाज ऐकून हा विचार सोडून देतो!)<br /><br />मग रेडिओ जॉकी बनणं जरा फारच झालं, पण निदान नॅशनल जिऑग्राफिकच्या एखाद्या फिल्मसाठी व्हॉइस-ओव्हर वगैरे.<br />एखाद्या NGO साठी काम करायचं. जे वाटतं त्यात आपण प्रत्यक्ष जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या नुसत्या वाटण्याला काय अर्थ आहे? मग भले NGO नाही सापडला तरी एखादं पाऊल टाकायचं.<br /><br />आणखी बरंच काही.. लिहिलंय त्यातल्या अर्ध्या गोष्टी जरी झाल्या तरी मग आणखी एक यादी बनवायला हरकत नाही.TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-63449559017464994022008-03-23T09:59:00.000-07:002008-03-23T10:04:50.991-07:00एका लग्नाची गोष्टधनेशचं, माझ्या मोठ्या भावाचं लग्न होऊन आता चार वर्षं झाली. म्हणजे ’लग्न’ या विषयावरून माझा छळ सुरु झाल्यालाही आता चार वर्षं झाली! मला अगदी स्पष्ट आठवतंय, मी रिसेप्शनच्या हॉलच्या गेटवर सर्वांना रिसिव्ह करायला उभा होतो. आई-बाबा गर्दीत कुठेतरी गायब झाले होते. धनेश स्टेजवर उभा होता. सगळे काका/मामा/आत्या/मावश्या मला सपोर्ट म्हणून माझ्याबरोबर उभे होते पण सव्वातीन मिनिटांच्या वर एका जागी टिकत नव्हते. ओळखीच्या झाडून सर्वांना बोलावल्याचा हा परिणाम.<br /><br />मग माझा बाजीप्रभू देशपांडे! कारण लोकांना रिसिव्ह करणं सोपं होतं पण एका (भोचक) काका-काकूंनी माझं स्वागत स्वीकारत आजूबाजूच्या वीस जणांना ऐकू जाईल अशा आवाजात विचारलं, "आता धनेशचं झालं, तुझं केव्हा?" एक तर ओळखीच्या आणि बिना-ओळखीच्या लोकांचं बत्तिशी दाखवत स्वागत करा आणि वर हे असले प्रश्न.<br /><br />शिवाय असले प्रश्न मोठे अडचणीत पाडणारे असतात. हो म्हणावं तरी झोल (’गुडघ्याला बाशिंग’ वाला प्रकार) आणि नाही म्हणावं तरी ’काय मूर्ख आहे हा, आता सगळ्यांची लग्नं होतातच, मग मुलं होतातच...’ असल्या नजरांना सामोरं जावं लागतं. तेव्हा मी नुसतं हसून वेळ मारून नेली होती. पण ’आता तुझं केव्हा?’ (लग्न हो!) हा प्रश्न मला चिकटला तो चिकटला. मग काही दिवस ’भारतात बालविवाह करायला बंदी आहे’ वगैरे उत्तरंही देऊन झाली. पण आता बहुतेक डोक्यावर अक्षता पडेपर्यंत त्यापासून सुटका नाही.<br /><br />मी काही लग्न करण्याच्या विरोधात नाही, पण काहीवेळा इतरच माझ्या लग्नाची घाई झाल्यासारखे वागतात. सोनालीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा जमलेल्या मित्रमंडळींपैकी एखाद-दुसरा (म्हणजे मीसुद्धा त्यातच!) सन्माननीय अपवाद वगळता बाकी सगळे मित्र सपत्निक किंवा मैत्रिणी सपती आल्या होत्या. मग चेतन म्हणाला पण, ’ आम्ही सगळे जोडीने आलोय आणि तू एकटा. किती अवघडल्यासारखं वाटतय ना?’ आता घ्या.. अवघडल्यासारखं वाटायला पाहिजे मला आणि मी मात्र मजेत म्हणून हे लोकं मलाच शिव्या घालताहेत. इतने साल की गेहरी (वगैरे) दोस्ती आणि लग्न होताच सगळ्यांची पार्टी चेंज!<br /><br /><span class=""></span>माझ्या मावशीने आणि तिच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीने (ही म्हणजे एकदम अधिकार वगैरे गाजवणारी माझी ताई) तर मला स्वतंत्रपणे गंभीर धमकी दिली आहे. गंमतीची गोष्ट अशी की दोन्ही धमक्यांमधील Terms and Conditions सारख्याच आहेत आणि त्या म्हणजे, माझं लग्न ठरल्याचं मी आधी तिलाच सांगायचं (Applicable to both!) आणि माझ्या होणाऱ्या बायकोला तीच आधी भेटणार! (Again applicable to both!!) म्हणजे मधल्या मधे माझाच बळी जाणार.<br /><br />सगळ्यात कहर झाला गेल्या आठवड्यात. माझा एक मित्र आहे. आता त्याला आपण ’क्ष’ म्हणू. तर या ’क्ष’चं लग्न होऊन झाले असतील सहा महिने. लग्न झाल्यापासून अगदी सभ्यतेचा पुतळाच झालाय जणू. अधून-मधून आम्ही त्याला त्याच्या ’मर्द बन’च्या दिवसांची आठवण करून देतो पण शेवटी होम मिनिस्ट्रीपुढे काय करणार बिचारा. तर त्याने मला फोन केला. बऱ्याच दिवसांनी बोलणं होत असल्याने रिवाजानुसार मी ’भ’कारांत विशेषणांनी त्याची विचारपूस केली. नेहमीचे रीति-रिवाज उरकल्यावर म्हणाला, ’बायको मागे लागली आहे, की तुझा मित्र लग्नाचं पाहतो आहे का ते विचार म्हणून.’ पुन्हा एकदा विशेष विशेषणांची उकळी आली, त्याला म्हणालो, ’गधड्या, आपल्यात तुझं लग्न आधी झालं तर बिनलग्नाचे इतर चारजण आत्महत्या करणार होते. आता तुझे दोनाचे चार झाले म्हणून हा तोरा का?’<br /><span class=""></span><br />त्यावर म्हणाला, ’अरे बाबा, ’क्षा(म्हणजे त्याची बायको)’ची एक खास मैत्रीणपण लग्नाची आहे म्हणून ही चौकशी..’ तरीच म्हणलं, हा एव्हढा समाजोपयोगी कामं कधीपासून करायला लागला.<br /><br />बरं ही चौकशी तेव्हढ्यातच थांबेल असं वाटलं होतं. पण दोन दिवसांनी ’क्षा’चा फोन! पुढे काय आणि कसं करायचं म्हणून विचारायला. तीपण म्हणालीच की तुझा मित्र किती कामाचा आहे ते माहित आहे म्हणून मीच फोन केला. आता ’क्ष’ला असले अनेक गुन्हे मी माफ केले आहेत. पण मुद्दा तो नाही. लग्न झालेल्यांना बिनलग्नाच्यांचं सुख बघवत नाही का माहित नाही. पण मुद्दा तोही नाही. अशावेळी नक्की काय करावं याचं अधिकृत प्रशिक्षण मी घेतलेलं नाही. कुछ करना पडेगा..<br /><br />आजूबाजूच्या वातावरणात हे अचानक झालेले बदल दखलपात्र आहेत हे नक्की. तेव्हा आता आमची विकेटही लवकर पडणार काय असं वाटायची वेळ आली आहे. Howz that?TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-822127951517060032008-03-16T09:29:00.000-07:002008-03-16T09:32:01.355-07:00बासरी आणि संतूरआज सकाळी दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसलो होतो. आजकाल काहीसुद्धा न करता डोळे मिटून शांत बसणं हे केवळ झोप या प्रकारातच मोडतं. पण रविवारची सकाळ आणि त्यामुळे वाटेल तेव्हा बिछान्याचा निरोप घेण्याची मुभा असल्याने, सहजी लोळताना कालची संध्याकाळ आठवली.<br /><br />दहा-बारा दिवसांपूर्वी ’सिलसिला - सुरों का’ ही पेपरमध्ये आलेली जाहिरात पाहूनच ’हा कार्यक्रम चुकवायचा नाही!’ असं ठरवलं होतं. हरीप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांच्या बासरी आणि संतूरच्या जुगलबंदीचा कार्यक्रम. आजवर हरीप्रसादांची बासरी आणि शिवकुमरांचा संतूर पुष्कळ वेळा ऐकला होता. अगदी त्यांची जुगलबंदीसुद्धा. पण केवळ कॅसेट, सीडी किंवा टीव्हीवर. प्रत्यक्षात कधीच नाही.<br /><br />खरंतर किती वेगळ्या जातीची ही वाद्यं. संतूर म्हणजे मधुर सुरांचा दाणा न दाणा स्पष्ट ऐकू येणार आणि किंचित घोगऱ्या आवाजाची बासरी काळजाचा ठाव घेणार. अर्थात सूर पेलणारा वादकही तेव्हढ्याच तयारीचा हवा. पण शिव-हरी ही जोडी असताना कार्यक्रम एकदम ’वसूल’ होणार याचीही खात्री होतीच. कार्यक्रमही तसा बऱ्यापैकी वेळेत सुरु झाला. प्रथम चरण केवळ संतूरचा! शिवकुमार शर्मांचे व्यक्तिमत्त्वच इतके प्रसन्न आहे की मांडीवर संतूर तोलत ऐटीत बसलेली त्यांची मूर्ती पाहूनच आपण खुश! मग अगदी शालीन, नम्र आवाजात त्यांची प्रस्तावना. कोणता राग सादर करणार आहोत, त्याची उलगड कशी होईल, पखवाजाची साथ नक्की कुठून सुरु होईल याची माहिती. शिवाय आम्ही संथ लयीत सुरुवात करतो आणि काय करता येईल याचा अंदाज बांधत लय, द्रुत लय पकडत नजाकती पेश करतो हेसुद्धा सांगितले. (ही सूचना विशेषत:, कार्यक्रम मुंबईत होता म्हणून असावी!)<br /><br />आणि मग सुरु झाली संतूरच्या सुरांची कशिदाकारी. काश्मिरच्या खोऱ्यातल्या या वाद्याच्या सुरावटी अगदी तलम रेशमी वस्त्रावर त्याहून अधिक तलम कशिदाकारी उमटत जावी तशाच उलगडत गेल्या. पखवाजाची साथ भवानीशंकरांची. संतूरच्या सूरांनी टाळ्या घेतल्या नसत्या तरच नवल.<br /><br />लाजवाब कारागिरी!<br /><br />मग द्वितीय चरण बासरीचा. एकदम टिपिकल भैया पिवळ्या रंगाचा झब्बा घातलेले हरिप्रसाद चौरसिया पाहून मनात पहिली प्रतिक्रिया उमटते ती म्हणजे, ’किती साधा आहे हा माणूस!’. आणि सुरुवातही तशीच. काहीही निवेदन नाही, काही नाही. निवेदिकेनंच ते कोणता राग सादर करणार आहेत याची माहिती दिलेली. विशेष म्हणजे, हरिप्रसादांची कला ही त्यांनी स्वकर्त्ऱुत्त्वावर विकसित केलेली. बासरी ही काही त्यांची पिढीजात संपत्ती नव्हे. मला हे माहित नव्हतं. सुरांचा उत्तुंग इमला त्यांनी स्वबळावर बांधला तर. अशी लोकं मला जरा जास्तच इंप्रेस करतात!<br /><br />काहीही न बोलता त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीच्या काही घोगऱ्या सुरांनंतर त्यांनी चक्क एक कॅनव्हास रंगवायला घेतला. दऱ्या-खोरं, नजर पोहोचेल तिथवर दिसणारी हिरवीकंच कुरणं, विस्तीर्ण जलाशय आणि बहारदार अरण्यं. सगळं काही स्पष्ट उभं झालं त्या सुरांतून. तबल्याची साथ विजय घाटे यांची. एकदम flawless performance. या दोघांनी एक छोटीशी जुगलबंदी रंगवली ती तर त्या कॅनव्हासवर सगळ्या रंगांची अचूक उधळण करून गेली! इथवरचा कार्यक्रमच पूर्ण वसूल होता. इथून पुढे फक्त बोनस.<br /><br />अंतिम चरण जुगलबंदीचा. कार्यक्रम बासरी आणि संतूरचा असला तरी पखवाज आणि तबला वाजवणारेही दिग्गजच. थोडक्यात काय तर चौघेही ’पंडित’ बिरुदावली मिरवणारे! शिवकुमारांनी, त्यांच्या हरिप्रसादांबरोबरच्या असणाऱ्या, जुगलबंदी किंवा स्वरांपलीकडे गेलेल्या मैत्रीविषयी सांगत सुरुवात केली. त्यावर हरिप्रसाद म्हणाले, ’अशीच मैत्री तबला आणि पखवाज यातही आज दिसावी अशी मी आशा करतो कारण वाजवणारे दोघेही महारथी आहेत, त्यामुळे कोणी कोणाचे ऐकावे असा प्रश्न न येवो!’ कमी बोलणारी माणसं शालजोडीतला हाणतात ती अशी!<br /><br />आतापर्यंत केवळ तलम कशिदाकारी असणारं रेशमी वस्त्र, बेहद लाजवाब निसर्गसौंदर्यच पाहिलं होतं. पण जुगलबंदी सुरु झाली आणि जे काही अनुभवलं ते अवर्णनीय होतं. थोडक्यातच सांगायचं झालं तर ते तलम कशिदाकारीचं वस्त्र ल्यायलेली कोणी सुंदरा त्या अफाट अरण्यात त्या जलाशयाच्या काठानं बेभान धावत होती!<br /><br />Simply marvelous...TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-90422644022990634492008-01-05T08:30:00.000-08:002008-01-05T08:35:51.878-08:00प्लालकट़्टी पट़्टानी मसालावर जे काही लिहिलय ते मेन्यु कार्डमध्ये वाचलं आणि म्हणलं हीच ती डिश.<br /><br />बाकीच्या चौघे अगदी ’घनिष्ठ’ मैत्र असले तरी त्यांच्यात मीच काय तो शुद्ध शाकाहारी. त्यामुळे या आंध्रा-केरळा मेन्युच्या हॉटेलात ते स्टार्टर्सही नॉनवेजच ऑर्डर करणार हे ओघाने आलेच. मग त्यांची कोंबडी आणि माश्यांची ऑर्डर देऊन झाली तरी वेटर आपला माझ्यापुढे उभाच. मी मनातल्या मनात ’दहा-वीस-तीस’ करून ही एकदम एक्झॉटिक नाव असणारी डिश निवडली.<br /><br />डिशचे वर्णन तर सहीच होते. पनीर काय, कसले कसले मसाले काय, मग त्याचं अजून काय काय करतात वगैरे वगैरे. भरीस भर म्हणून बाकी सगळ्यांच्या ऑर्डर्स आल्या तरी अस्मादिकांच्या ’प्लालकट़्टी पट़्टानी मसाला’चा पत्ता नव्हता. मग सगळ्यांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आणि वेटर मटार-पनीर घेऊन आला!<br /><br />टोटल पोपट.<br /><br />आता मटार-पनीरला आंध्रात हे असले काहीतरी भयंकर नाव आहे हे मला काय माहित. बरं जर मटार आणि पनीर जर त्यातले मुख्य घटक असले तरी त्याचं काहीतरी वेगळं नाही का करायचं? चांगला डायरेक्टर मिळाला की शाहरुख खान पण क..क..किरण करीत नाही. मग नाव मारे मोठे असले तरी या हॉटेलातला कूक अगदीच बेचव असावा. आईकडे ट्रेनिंगसाठी पाठवला पाहिजे त्याला. नावडत्या भाज्या एक्झॉटिक करून आमच्या गळी कशा उतरवायच्या यात तिचा हात धरणारे कोणी नाही.<br /><br />असो.<br /><br />तर नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा म्हणतात ते काही अगदीच खोटे नाही.<br /><br />पुढच्या वेळी असल्या नविन ठिकाणी गेल्यावर ’दहा-वीस-तीस’ पेक्षा टॉस केलेला बरा का ’अडम-तडम तडतडबाजा’ जास्त इफ़ेक्टिव रिझल्ट देईल याचाच विचार करतो आहे सध्या.TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-75596122573992369072008-01-01T06:55:00.000-08:002008-01-01T06:58:42.455-08:00२००८पुन्हा एक नवे वर्ष<br /><br />पुन्हा काही नवी स्वप्नं<br /><br />तीच ती आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा<br /><br />And the same old me!TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-2036950754806140155.post-67029428543463731072007-12-25T17:36:00.000-08:002007-12-25T17:38:14.961-08:00काही जुने दिवसघड्याळात चार वाजलेले बघायला लागणं म्हणजे एक शिक्षा आहे. <br /><br />म्हणजे सकाळचे चार वाजलेले बघायला लागणं ही एक शिक्षा आहे. <br /><br />म्हणजे त्याचं असं झालं की आम्ही एका प्रोजेक्टवर काम करीत आहोत. मी अजून तसा नविनच आहे त्यामुळे बरोबरच्या मंडळींवर थोडी जास्त डिपेन्डन्सी. इतर कामाच्या गडबडीत या प्रोजेक्टचं काम थोडं मागे पडलेलं. मग बॉसनं अचानक रिलीज डेट मागितली आणि मी फोन उचलून त्या व्हेंडरला झापला, ’इतकी कामं राहिली आहेत, करताय काय?’ मग पुरेशा तडजोडीनंतर असं ठरलं की मी आणि माझा एक सहकारी अशा दोघांनी बॅंगलोरला त्या व्हेंडरच्या ऑफिसमध्ये जाऊन महत्त्वाची सगळी कामं निपटवायची.<br /><br />मुहुर्त लगेच दुसऱ्या दिवशीचा होता, आणि माझ्या कोणत्याही काकाच्या मालकीची विमान कंपनी नसल्यामुळे, सकाळी सव्वासहाच्या फ्लाईटची तिकिटं मिळाली. म्हणजे सकाळी चारलाच उठायला लागणार ना?<br /><br />बॅंगलोरमध्ये उतरलो तर चक्क रिमझिम पाऊस पडत होता आणि मस्त थंडी होती. अगदी बिनकामाच्या चकाट्या पिटत फिरायला योग्य अशी. पण आमच्या डोळ्यासमोर बॉसनं मागितलेली रिलीज डेट! मग मुकाट त्या व्हेंडरचं ऑफिस गाठलं. दिवसभर त्याच्या मेंदूचा पुरता फडशा पाडला. डिमांडिंग पोझिशनमध्ये असल्याचा हाच फायदा होतो. सकाळी नऊला सुरु झालेली मिटींग संध्याकाळी साडेसहाला संपली तेव्हा सगळ्यांचाच टाईम-आऊट झाला होता. <br /><br />परतण्याआधीचे दोन-तीन तास काय करायचं म्हणून कुठेतरी जाऊन बसायचं असा प्लान होता. माझ्या सहकाऱ्याचा बॅंगलोरमधील मित्र ही जबाबदारी पार पाडणार होता. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर जायला निघालो आणि रिक्षातून बॅंगलोर-दर्शन सुरु झाले. जाता जाता सहज रेसिडेंसी रोड असं नाव वाचलं. थोडं आणखी पुढे गेल्यावर ’कासा पिकोला’ नामक ’द इटालियन वे’ रेस्तरॉं दिसले. ओळख पटायला वेळ अजिबात लागला नाही. कारण बॅंगलोरशी ओळख याआधीच झाली होती.<br /><br />सात-आठ वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना इंडस्ट्रियल टूरच्या नावाखाली जिवाचे बॅंगलोर करून झाले होते. करीयर, स्पर्धा, असली आयुष्य, इंडस्ट्री, जॉबची समीकरणं असल्या गोष्टींची अजून ओळख व्हायची होती. हिंदुस्थान एरोनॉटिक्स, फिलिप्स, इस्रो च्या भेटी भलत्याच इन्स्पिरेशनल होत्या. शिवाय मला नक्की आठवतं, विप्रो-इन्फोसिस चे कॅम्पस पाहूनच जनता पागल झाली होती. त्यांचे अवाढव्य चकाचक कॅम्पस, आलिशान ऑफिसेस, पॉश कॅंटीन्स, कॉफीशॉप्स कॉलेजच्या पोरांना इम्प्रेस न करतील तरच नवल होते. इन्फोसिसमध्ये तर एका हिरव्यागार कुरणाच्या मध्याशी असणाऱ्या छोट्याशा जलाशयात पाय सोडून बसलेले प्रणयी युगुल (तेही ऑफिसच्या वेळात!) पाहून, इन्फोसिस जॉइन करणे म्हणजे बॉलिवूडच्या सिनेमात हिरो बनण्याइतकेच स्वप्नाळू वाटले होते!<br /><br />शिवाय दिवसभर अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरून झाल्यावर रात्री श्रमपरिहारार्थ सगळ्या हॅपनिंग ठिकाणांना भेट देणं अपरिहर्यच होतं. एम. जी रोड, ब्रिगेड रोड, रेसिडेन्सी रोड इथली सगळी ठिकाणं पालथी घातली होती. सगळी मॉल्स, दुकानं, हॉटेल्स सगळं फिरून झालं होतं. तेव्हाच कधीतरी त्या ’कासा पिकोला’चा शोध लागला होता..<br /><br />ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तेथील मजा तर शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. आम्ही पुरते तीन मजले व्यापले असतानाही बहुतांश सगळी जनता केवळ दोन-तीन रूम्समध्येच पडलेली असायची. नाच, गाणी, गप्पा, बौद्धिकं सगळ्याचाच महापूर आला होता! ’प्लॅंचेट’चाही एक फ़ेल्ड अटेंप्ट करून झाला होता. त्या रात्री तर आम्ही एव्हढे हसलो होतो. नुसता धुमाकूळ घातला होता. हॉटेलचा मॅनेजर आम्हाला शांत करता करता वेडापिसा झाला होता..<br /><br />आईशप्पथ, काय दिवस होते ते..TheKinghttp://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.com2