Monday, September 24, 2007

चक दे इंडिया

भारताने ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटचा पहिला विश्वचषक जिंकला!

टीम इंडियामध्ये सगळी विशी-पंचविशीची पोरं. झिपरा धोनी कर्णधार, कोच गायब. शिवाय ऑस्ट्रेलिया होतीच, म्हणजे खरं तर उपविजेताच निवडायचा होता. अशात ही टीम काय दिवे लावणार असं वाटत असतानाच ही मंडळी चक्क जिंकली फायनलमध्ये. क्या बात है!

ट्वेंटी-ट्वेंटी मध्ये जिंकले आता कसोटीत किती चांगले खेळणार असे प्रश्न कृपया कोणी विचारु नका. बेसबॉल आणि टेनिसची तुलना करतं का कोणी कधी? ट्वेंटी-ट्वेंटी आणि कसोटी, दोन्हीचा पिंड वेगळा. मानसिकता वेगळी. पाच दिवस आणि पाच तास यात जेव्हढा फरक तेव्हढाच यातही.

बाकी फायनल मोठी झकास झाली. जिंकणार की नाही याची गोपनीयता शेवटच्या बॉलपर्यंत राखणं फक्त टीम इंडियालाच जमू शकतं. धोनी, युवराज, पठाण, शर्मा, सिंग सगळेच चमकले.

आणि ट्वेंटी-ट्वेंटी च्या मॅचेस म्हणजे तद्दन फिल्मी प्रकार होता. कमी षटकांबरोबरच मैदानातच कडेला बसलेल्या टीम्स, रॅंडम मेसेजेस दाखविणारा स्कोअरबोर्ड, फटाके इतकं सगळं कमी होतं की काय म्हणून प्रत्येक फ़ोर, सिक्सला नाचायला नाच्ये पण आणलेले. पण मजा आली.

मुख्य म्हणजे आपण पाकिस्तानला हरवून जिंकलो!

2 comments:

rayshma said...

the last line sums it up... :)

Unknown said...

hey thanks alot for the wishes.. and commenting on my blog.. i just read ur blog few days ago.. u write well ! :)